शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

विदर्भात पाच वर्षांतील सर्वांत कमी जलसाठा

By admin | Updated: May 2, 2016 00:38 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा सर्वांत कमी आहे.जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भात प्रामुख्याने तोतलाडोह, कामठी खैरी, खिंडसी, वडगाव, इटियाडोह, सिरपूर, पुजारी टोला, कालिसरार, असोलामेंढा, दिना, बोर, धाम, पोथरा, लोअर वर्धा, गोसेखुर्द, बावनथडी, इरई व संजय सरोवर असे एकूण १९ मोठे जलप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ३ हजार २५७ दलघमी असून, सध्या त्यात ८८७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटी १ हजार ३१५ दलघमी एवढा जलसाठा होता. तसेच २०१२ मध्ये ९४०, २०१३ मध्ये १ हजार २० व २०१४ मध्ये १ हजार ६७४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. या आकडेवारीवरू न यंदाचा पाणीसाठा सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या जलसाठ्यावर उन्हाळ्याचा आणखी एक महिना काढण्याचे आव्हान विदर्भापुढे आहे.मध्यम तलावांत १७ टक्के पाणीसंपूर्ण विदर्भात मोठ्या प्रकल्पांसोबतच एकूण २३ मध्यम प्रकल्प असून, त्यात २८ एप्रिलपर्यंत १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकरानाला, वेणा, कान्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा,सायकी, जाम, कार, चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना, बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड व रेंगेपार या प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी १३ प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून, चार भंडारा जिल्ह्यात, तर सहा गोंदिया जिल्ह्यात आहेत.