शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पाच वर्षांतील सर्वांत कमी जलसाठा

By admin | Updated: May 2, 2016 00:38 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा सर्वांत कमी आहे.जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भात प्रामुख्याने तोतलाडोह, कामठी खैरी, खिंडसी, वडगाव, इटियाडोह, सिरपूर, पुजारी टोला, कालिसरार, असोलामेंढा, दिना, बोर, धाम, पोथरा, लोअर वर्धा, गोसेखुर्द, बावनथडी, इरई व संजय सरोवर असे एकूण १९ मोठे जलप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ३ हजार २५७ दलघमी असून, सध्या त्यात ८८७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटी १ हजार ३१५ दलघमी एवढा जलसाठा होता. तसेच २०१२ मध्ये ९४०, २०१३ मध्ये १ हजार २० व २०१४ मध्ये १ हजार ६७४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. या आकडेवारीवरू न यंदाचा पाणीसाठा सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या जलसाठ्यावर उन्हाळ्याचा आणखी एक महिना काढण्याचे आव्हान विदर्भापुढे आहे.मध्यम तलावांत १७ टक्के पाणीसंपूर्ण विदर्भात मोठ्या प्रकल्पांसोबतच एकूण २३ मध्यम प्रकल्प असून, त्यात २८ एप्रिलपर्यंत १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकरानाला, वेणा, कान्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा,सायकी, जाम, कार, चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना, बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड व रेंगेपार या प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी १३ प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून, चार भंडारा जिल्ह्यात, तर सहा गोंदिया जिल्ह्यात आहेत.