शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी करणार लोटांगण आंदोलन

By admin | Updated: January 16, 2015 06:17 IST

ऊसदरप्रश्नी तोडगा काढून येत्या आठवड्याभरात दर घोषित करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भय्या देशमुख

मुंबई : ऊसदरप्रश्नी तोडगा काढून येत्या आठवड्याभरात दर घोषित करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भय्या देशमुख यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भय्या यांनी मागण्यांचे निवेदन दिले. शिवाय आठ दिवसांत दर घोषित केले नाही, तर सोलापूर एसटी स्टँडपासून पालकमंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत लोटांगण घालून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला असूनही सरकारने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे गळीत हंगामातील गेलेल्या उसाला पहिली उचल ३ हजार रुपये आणि दोन महिन्यांचे व्याज बँक खात्यावर जमा करावे. उसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये देणे कोणत्याही कारखानदाराला परवडते. कारण केवळ साखरेच्या दरावर भाव ठरवणाऱ्या प्रशासनाने उसापासून तयार होणाऱ्या मळी, भुस्सा, इथेनॉल, वीज, दारू फॅक्टरी (वाईनरी) हे विविध प्रकारचे उत्पादनही ध्यानात घ्यायला हवे. त्याचा कोट्यवधी रुपयांचा फायदा साखर कारखानदारांना होतो. त्यामुळे या सर्व उत्पादनांचा विचार करून सरकारने उसाचे दर जाहीर करावेत, अशी मागणी भय्या यांनी केली आहे.दरम्यान, जुन्या एफ.आर.पी.च्या नियमात बदल करण्याची मागणी भय्या यांनी केली आहे. चालू खताचे दर, मजुरी, वीज, रोगांचे औषध या वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र ऊसदरात वाढ केली जात नाही. शिवाय सर्व कारखान्यांच्या जवळपास डिजिटल वजनकाटे बसवून शेतकऱ्यांची लूटमार थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.