शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

हरवलेले आजोबा सुखरूप घरी परतले

By admin | Updated: March 3, 2016 04:19 IST

मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.

मुंबई : मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.२० फेब्रुवारी रोजी नोकरीवर जाताना दीपक यांना चेंबूरमधील विष्णूनगर येथे एक वयस्कर गृहस्थ अस्वस्थ असल्याचे दिसले. त्यांच्याविषयी काळजी निर्माण झाल्यानंतर त्याने चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून नावशिवाय त्यांना काहीच मिळत नव्हती. त्यामुळे केवळ नावावरच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे दीपकने ठरवले. त्यानंतर तो त्यांच्याशी दररोज संवाद साधू लागला. संवादावेळी आपल्या आणि त्यांच्या भाषेत दीपकला साधर्म्य आढळले. शिवाय त्यांच्याकडून काही गावांची माहिती मिळू लागली. यावरून दीपकने अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचारणा केली. अखेरीस त्यांनी ‘माकेगाव’ असा शब्द उच्चारल्यानंतर त्याविषयी शोध घेण्यात आला. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई तालुक्यात हे गाव असल्याचे समजल्यावर तेथील कृषी समितीशी संपर्क साधण्यात आला. शिवाय तेथील पोलिसांशी संपर्क साधत त्यांनी देशमुख यांची चौकशी करत पत्ता मिळवला. आणि तब्बल ८ महिन्यांपासून मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या या ज्येष्ठ नागरिकास त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.मुंबईच्या गर्दीत अनेक माणसे भरकटलेली आढळतात. त्यांचे मानसिक संतुलनही बिघडलेले असते. अशांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचा प्रयत्न सगळ््यांनी करायला पाहिजे.- दीपक गोरेवारपंढरपूर यात्रेसाठी गेलेले सासरे घरी परतलेच नाही. त्यांच्या हरवण्याची तक्रार पोलीसांत केली होती. ८ महिन्यांपूर्वी हरवलेले सासरे परत येतील, अशी अपेक्षा होती. दीपक गोरेवार यांच्या मेहनतीमुळे सासरे सुखरुप परतले.- प्रियंका देशमुख,धर्मराज देशमुख यांची सून