शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

रस्ता खचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: September 24, 2016 02:47 IST

परतीच्या पावसाने पोशीर नदीला पूर आल्याने गुरु वारी रात्री ११ च्या सुमारास पोशीर - माले रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे.

नेरळ : सतत आठवडाभर कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने पोशीर नदीला पूर आल्याने गुरु वारी रात्री ११ च्या सुमारास पोशीर - माले रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या रस्त्याची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता खचून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरु स्ती केली नसल्याने पुन्हा खचला असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील पोशीर ते माले या तीन किलोमीटर रस्ता असून पोशीर नदीजवळ हा रस्ता गुरु वारी ११ वाजता मोठ्या प्रमाणात खचला. माले येथील ग्रामस्थ योगेश वेहले आणि संदीप वेहले हे रात्री दुचाकीवरून घरी येत असताना रस्त्यावरून पुराचे पाणी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. पाणी कमी झाल्यानंतर त्यांना हा रस्ता खचल्याचे लक्षात आले. रस्ता खचून रस्त्यांची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा नेरळ-कळंब रस्त्याला जोडणारा पोशीर-माले-आर्ढे हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे. दोन वर्षापूर्वीही हा रस्ता खचला होता. परंतु दोनवर्षे उलटूनही बांधकाम विभागाने यावर कोणतीही डागडुजी केली नव्हती. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता बी. बी. कुराडे यांनी रस्त्याची पाहणी करु न या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ४ लाख १० हजार रु पयांचा दुरु स्ती प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु दोनवर्षातही रस्त्याचे काम करता आले नाही. बांधकाम विभागाकडून हा निधी अपूर्ण पडत असल्याने या रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. रस्त्याच्या कडेला ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेतकऱ्यांची रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी असल्याने हे काम केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याने या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेऊन प्रकाश फरात यांनी स्वखर्चाने मातीचा भराव टाकला होता. परंतु हा भराव सुद्धा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करु न रस्त्यात संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांकडून केली जात आहे. हा रस्ता दोन वर्षांपासून खचल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. >दुरु स्तीचा प्रस्तावरस्त्याच्या दुरु स्तीसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु हा निधी कमी प्रमाणात असल्याने चांगल्या दर्जाचे काम करता आले नसते. त्यामुळे पुन्हा खचलेल्या रस्त्याची पाहणी करु न रस्त्याची रुं दी वाढवून, रस्त्याला संरक्षण भिंत उभरता येईल अशा प्रकारे नवीन प्रस्ताव तयार करु न जि. प. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता ए. ए. केदार यांनी सांगितले.