शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: September 24, 2016 02:47 IST

परतीच्या पावसाने पोशीर नदीला पूर आल्याने गुरु वारी रात्री ११ च्या सुमारास पोशीर - माले रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे.

नेरळ : सतत आठवडाभर कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने पोशीर नदीला पूर आल्याने गुरु वारी रात्री ११ च्या सुमारास पोशीर - माले रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या रस्त्याची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता खचून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरु स्ती केली नसल्याने पुन्हा खचला असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील पोशीर ते माले या तीन किलोमीटर रस्ता असून पोशीर नदीजवळ हा रस्ता गुरु वारी ११ वाजता मोठ्या प्रमाणात खचला. माले येथील ग्रामस्थ योगेश वेहले आणि संदीप वेहले हे रात्री दुचाकीवरून घरी येत असताना रस्त्यावरून पुराचे पाणी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. पाणी कमी झाल्यानंतर त्यांना हा रस्ता खचल्याचे लक्षात आले. रस्ता खचून रस्त्यांची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा नेरळ-कळंब रस्त्याला जोडणारा पोशीर-माले-आर्ढे हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे. दोन वर्षापूर्वीही हा रस्ता खचला होता. परंतु दोनवर्षे उलटूनही बांधकाम विभागाने यावर कोणतीही डागडुजी केली नव्हती. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता बी. बी. कुराडे यांनी रस्त्याची पाहणी करु न या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ४ लाख १० हजार रु पयांचा दुरु स्ती प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु दोनवर्षातही रस्त्याचे काम करता आले नाही. बांधकाम विभागाकडून हा निधी अपूर्ण पडत असल्याने या रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. रस्त्याच्या कडेला ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेतकऱ्यांची रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी असल्याने हे काम केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याने या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेऊन प्रकाश फरात यांनी स्वखर्चाने मातीचा भराव टाकला होता. परंतु हा भराव सुद्धा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करु न रस्त्यात संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांकडून केली जात आहे. हा रस्ता दोन वर्षांपासून खचल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. >दुरु स्तीचा प्रस्तावरस्त्याच्या दुरु स्तीसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु हा निधी कमी प्रमाणात असल्याने चांगल्या दर्जाचे काम करता आले नसते. त्यामुळे पुन्हा खचलेल्या रस्त्याची पाहणी करु न रस्त्याची रुं दी वाढवून, रस्त्याला संरक्षण भिंत उभरता येईल अशा प्रकारे नवीन प्रस्ताव तयार करु न जि. प. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता ए. ए. केदार यांनी सांगितले.