शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पैसे खाण्यात कमी पडलो : राज ठाकरे

By admin | Updated: February 20, 2017 04:17 IST

सत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालविला

गौरीशंकर घाळे / मुंबईसत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालविला आहे. प्रचारात या पक्षांनी ज्या प्रमाणावर पैसा उधळण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो असे वाटू लागल्याची तिरकस भावना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी या वेळी जोरदार टीका केली. नोटाबंदीनंतर फक्त भाजपाकडेच पैसा दिसतोय. निवडणुकीत फक्त आपल्याकडेच पैसे राहतील अशी व्यवस्था भाजपाने केली. सगळी निवडणूकच पैशाचा खेळ बनवून टाकल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. २० वर्षे महापालिकेत सत्ता असूनही या पक्षांना विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळेच आता एकमेकांवर टीका करण्याचा खेळ शिवसेना - भाजपाने चालविला आहे. आधी टीका करायची आणि नंतर एकत्र यायचे हेच भाजपा, शिवसेनेचे धोरण आहे. कल्याण-डोंबिवलीतही त्यांनी हेच केले होते, अशी टीका राज यांनी केली. विकासकामे केली असती तर मुख्यमंत्री फडणवीस यांना थापा माराव्या लागल्या नसत्या. ते टीका करताहेत आणि मनसे आपल्या विकासकामांचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ करत आहे. पाच वर्षांचा कामांचा असा लेखाजोखा मांडणारा मनसे हा पहिलाच पक्ष असल्याचा दावाही राज यांनी केला. मनसेला लागलेल्या गळतीबाबत विचारले असता राज म्हणाले की, काही लोकांसाठी महापालिका म्हणजे पैसे कमावण्याचे दुकान आहे. अशा लोकांना विरोध केला म्हणूनच ही मंडळी वैयक्तिक कारणासाठी पक्ष सोडून गेली. मात्र अशा लोकांच्या जाण्याने मनसेला काही फरक पडणार नाही. सामान्य मनसैनिक आणि जनता आजही माझ्यासोबत आहे. तसे नसते तर नाशिकच्या सभेत इतकी गर्दी आणि उत्साह दिसला नसता, असेही राज म्हणाले. मुंबई तोडण्याचा डावप्रस्तावित मुंबई मेट्रोचा मार्ग  आणि रचना मुंबईतील मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे. मेट्रो जिथे येईल तिथे जागांचे भाव वाढतील आणि मराठी माणूस स्वाभाविकपणे बाहेर फेकला जाईल. या दृष्टीनेच मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मी कधीच विकासाला विरोध केला नाही. मात्र हा विकास बाहेरच्यांच्या पथ्यावर तर पडत नाही ना, याचा विचार व्हायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले.