शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पैसे खाण्यात कमी पडलो : राज ठाकरे

By admin | Updated: February 20, 2017 04:17 IST

सत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालविला

गौरीशंकर घाळे / मुंबईसत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालविला आहे. प्रचारात या पक्षांनी ज्या प्रमाणावर पैसा उधळण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो असे वाटू लागल्याची तिरकस भावना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी या वेळी जोरदार टीका केली. नोटाबंदीनंतर फक्त भाजपाकडेच पैसा दिसतोय. निवडणुकीत फक्त आपल्याकडेच पैसे राहतील अशी व्यवस्था भाजपाने केली. सगळी निवडणूकच पैशाचा खेळ बनवून टाकल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. २० वर्षे महापालिकेत सत्ता असूनही या पक्षांना विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळेच आता एकमेकांवर टीका करण्याचा खेळ शिवसेना - भाजपाने चालविला आहे. आधी टीका करायची आणि नंतर एकत्र यायचे हेच भाजपा, शिवसेनेचे धोरण आहे. कल्याण-डोंबिवलीतही त्यांनी हेच केले होते, अशी टीका राज यांनी केली. विकासकामे केली असती तर मुख्यमंत्री फडणवीस यांना थापा माराव्या लागल्या नसत्या. ते टीका करताहेत आणि मनसे आपल्या विकासकामांचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ करत आहे. पाच वर्षांचा कामांचा असा लेखाजोखा मांडणारा मनसे हा पहिलाच पक्ष असल्याचा दावाही राज यांनी केला. मनसेला लागलेल्या गळतीबाबत विचारले असता राज म्हणाले की, काही लोकांसाठी महापालिका म्हणजे पैसे कमावण्याचे दुकान आहे. अशा लोकांना विरोध केला म्हणूनच ही मंडळी वैयक्तिक कारणासाठी पक्ष सोडून गेली. मात्र अशा लोकांच्या जाण्याने मनसेला काही फरक पडणार नाही. सामान्य मनसैनिक आणि जनता आजही माझ्यासोबत आहे. तसे नसते तर नाशिकच्या सभेत इतकी गर्दी आणि उत्साह दिसला नसता, असेही राज म्हणाले. मुंबई तोडण्याचा डावप्रस्तावित मुंबई मेट्रोचा मार्ग  आणि रचना मुंबईतील मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे. मेट्रो जिथे येईल तिथे जागांचे भाव वाढतील आणि मराठी माणूस स्वाभाविकपणे बाहेर फेकला जाईल. या दृष्टीनेच मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मी कधीच विकासाला विरोध केला नाही. मात्र हा विकास बाहेरच्यांच्या पथ्यावर तर पडत नाही ना, याचा विचार व्हायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले.