शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:04 IST

जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे.

हिंगणघाट (वर्धा) : जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. रविवारी हिंगणघाट येथे आयोजित धर्मसंमेलनात ते बोलत होते.

हिंगणघाटनजिकच्या वालधूर येथे पार्श्व पद्मावती मंदिराचे निर्माण सौभाग्यमलजी डागा परिवाराकडून करण्यात आले आहे. येथे पार्श्व पद्मावती देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील जैन मंदिरात धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, राजेंद्रकुमार डागा, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया, अतुल कोटेचा, रितेश कोचर व मुनीराज आगमनरत्नसागरजी म.सा., मुनीराज प्रशमरत्नसागरजी म.सा., वज्ररत्नसागरजी म.सा., सुरेखाश्रीजी म.सा., चारित्ररसाश्रीजी म.सा., नवपूर्वरसाश्रीजी म.सा., श्रियमरसाश्रीजी म.सा., प्रियमरसाश्रीजी म.सा. आदी उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ व माळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले की, जैन साधू संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून ‘जीवन जीने की कला’ शिकविण्यासोबतच पर्यावरण, हिंसाचार, अपरिणय याबाबतही संदेश समाजाला देण्याची गरज आहे. गरिबीच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ‘जिओ जिने दो’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आई ही सर्वात मोठी शिक्षक असते, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कटारिया यांनी केले. धर्मसंमेलनापूर्वी शहरातून वरघोडा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील जैन मुनींचे दर्शन विजय दर्डा यांनी घेतले. या शोभायात्रेत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जैन समाजातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम तरुणांनी करण्याची गरज आहे. नागपूर येथील यापूर्वी साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या उपस्थितीत विविध पंथांतील संताना एकत्रित आणण्यात आले होते. हे काम तरुणांनी पुढे न्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले.