शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:04 IST

जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे.

हिंगणघाट (वर्धा) : जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. रविवारी हिंगणघाट येथे आयोजित धर्मसंमेलनात ते बोलत होते.

हिंगणघाटनजिकच्या वालधूर येथे पार्श्व पद्मावती मंदिराचे निर्माण सौभाग्यमलजी डागा परिवाराकडून करण्यात आले आहे. येथे पार्श्व पद्मावती देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील जैन मंदिरात धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, राजेंद्रकुमार डागा, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया, अतुल कोटेचा, रितेश कोचर व मुनीराज आगमनरत्नसागरजी म.सा., मुनीराज प्रशमरत्नसागरजी म.सा., वज्ररत्नसागरजी म.सा., सुरेखाश्रीजी म.सा., चारित्ररसाश्रीजी म.सा., नवपूर्वरसाश्रीजी म.सा., श्रियमरसाश्रीजी म.सा., प्रियमरसाश्रीजी म.सा. आदी उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ व माळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले की, जैन साधू संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून ‘जीवन जीने की कला’ शिकविण्यासोबतच पर्यावरण, हिंसाचार, अपरिणय याबाबतही संदेश समाजाला देण्याची गरज आहे. गरिबीच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ‘जिओ जिने दो’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आई ही सर्वात मोठी शिक्षक असते, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कटारिया यांनी केले. धर्मसंमेलनापूर्वी शहरातून वरघोडा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील जैन मुनींचे दर्शन विजय दर्डा यांनी घेतले. या शोभायात्रेत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जैन समाजातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम तरुणांनी करण्याची गरज आहे. नागपूर येथील यापूर्वी साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या उपस्थितीत विविध पंथांतील संताना एकत्रित आणण्यात आले होते. हे काम तरुणांनी पुढे न्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले.