शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:04 IST

जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे.

हिंगणघाट (वर्धा) : जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. रविवारी हिंगणघाट येथे आयोजित धर्मसंमेलनात ते बोलत होते.

हिंगणघाटनजिकच्या वालधूर येथे पार्श्व पद्मावती मंदिराचे निर्माण सौभाग्यमलजी डागा परिवाराकडून करण्यात आले आहे. येथे पार्श्व पद्मावती देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील जैन मंदिरात धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, राजेंद्रकुमार डागा, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया, अतुल कोटेचा, रितेश कोचर व मुनीराज आगमनरत्नसागरजी म.सा., मुनीराज प्रशमरत्नसागरजी म.सा., वज्ररत्नसागरजी म.सा., सुरेखाश्रीजी म.सा., चारित्ररसाश्रीजी म.सा., नवपूर्वरसाश्रीजी म.सा., श्रियमरसाश्रीजी म.सा., प्रियमरसाश्रीजी म.सा. आदी उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ व माळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले की, जैन साधू संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून ‘जीवन जीने की कला’ शिकविण्यासोबतच पर्यावरण, हिंसाचार, अपरिणय याबाबतही संदेश समाजाला देण्याची गरज आहे. गरिबीच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ‘जिओ जिने दो’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आई ही सर्वात मोठी शिक्षक असते, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कटारिया यांनी केले. धर्मसंमेलनापूर्वी शहरातून वरघोडा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील जैन मुनींचे दर्शन विजय दर्डा यांनी घेतले. या शोभायात्रेत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जैन समाजातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम तरुणांनी करण्याची गरज आहे. नागपूर येथील यापूर्वी साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या उपस्थितीत विविध पंथांतील संताना एकत्रित आणण्यात आले होते. हे काम तरुणांनी पुढे न्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले.