शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

गरिबांकडे सहानुभूतीने बघा

By admin | Updated: April 3, 2015 02:42 IST

वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले.

मुंबई : वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले. १४ कोटी खात्यांद्वारे १४ हजार कोटी रुपये वित्तीय व्यवस्थेत आले. पण, ही केवळ सरकारनेच चालविण्याची योजना नसून या योजनेत भारतीय रिझर्व्ह बँकेने सक्रिय सहभागी होतानाच, आर्थिक योजनेचा मध्यबिंदू देशातील गरिब असावा, असे मत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी व्यक्त केले. भारतीय रिझर्व्ह बँकेला ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वित्तीय समायोजन, वित्तीय व्यवस्थेची गरिबांबद्दल असलेली अनास्था, कालमर्यादा निश्चित करून आखल्या जातील अशा लोकाभिमुख योजना आणि मेक इन इंडिया या मुद्यांभोवती पंतप्रधानांनी भाष्य केले. देशातील गरिब लोकांना बँकिंग व्यवस्थेचा अधिकाधिक फायदा होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडतानाच, बँकांनी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त करतानाच बँकिंग व्यवस्थेचा प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून, त्यांना वित्तपुरवठा करताना त्यात निधीचा अभाव येऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ वर्तमानपत्र आणि टीव्ही मीडियापुरता मर्यादित विषय नसून शेतकऱ्यांना मदत केल्याने बँका दिवाळखोरीत निघणार नाहीत हे बँकांनीदेखील समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गरीब आणि शेतकरी या दोन्ही घटकांना कर्ज देताना आणि त्याची वसुली करताना बँकांनी संवेदनशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.वित्तीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आणि त्याचे फायदे सर्व स्तरातील लोकांना मिळण्यासाठी धोरण राबविले जात आहे. आगामी २० वर्षांत याची व्याप्ती तळागाळापर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. २०१९ साली महात्मा गांधी यांची १५०वी जयंती, २०२२ साली रिझर्व्ह बँकेची ७५ वर्षे, २०२५ साली रिझर्व्ह बँकेची ९० वर्षे आणि २०३५ साली शिखर बँखेची १०० वर्षे या टप्प्यांनुसार निश्चित उद्दिष्ट ठेवून देशातील प्रत्येक व्यक्ती अर्थसाखळीशी जोडली जायला हवी, अशी संकल्पना मोदी यांनी मांडली. मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)