शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

गरिबांकडे सहानुभूतीने बघा

By admin | Updated: April 3, 2015 02:42 IST

वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले.

मुंबई : वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले. १४ कोटी खात्यांद्वारे १४ हजार कोटी रुपये वित्तीय व्यवस्थेत आले. पण, ही केवळ सरकारनेच चालविण्याची योजना नसून या योजनेत भारतीय रिझर्व्ह बँकेने सक्रिय सहभागी होतानाच, आर्थिक योजनेचा मध्यबिंदू देशातील गरिब असावा, असे मत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी व्यक्त केले. भारतीय रिझर्व्ह बँकेला ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वित्तीय समायोजन, वित्तीय व्यवस्थेची गरिबांबद्दल असलेली अनास्था, कालमर्यादा निश्चित करून आखल्या जातील अशा लोकाभिमुख योजना आणि मेक इन इंडिया या मुद्यांभोवती पंतप्रधानांनी भाष्य केले. देशातील गरिब लोकांना बँकिंग व्यवस्थेचा अधिकाधिक फायदा होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडतानाच, बँकांनी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त करतानाच बँकिंग व्यवस्थेचा प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून, त्यांना वित्तपुरवठा करताना त्यात निधीचा अभाव येऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ वर्तमानपत्र आणि टीव्ही मीडियापुरता मर्यादित विषय नसून शेतकऱ्यांना मदत केल्याने बँका दिवाळखोरीत निघणार नाहीत हे बँकांनीदेखील समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गरीब आणि शेतकरी या दोन्ही घटकांना कर्ज देताना आणि त्याची वसुली करताना बँकांनी संवेदनशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.वित्तीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आणि त्याचे फायदे सर्व स्तरातील लोकांना मिळण्यासाठी धोरण राबविले जात आहे. आगामी २० वर्षांत याची व्याप्ती तळागाळापर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. २०१९ साली महात्मा गांधी यांची १५०वी जयंती, २०२२ साली रिझर्व्ह बँकेची ७५ वर्षे, २०२५ साली रिझर्व्ह बँकेची ९० वर्षे आणि २०३५ साली शिखर बँखेची १०० वर्षे या टप्प्यांनुसार निश्चित उद्दिष्ट ठेवून देशातील प्रत्येक व्यक्ती अर्थसाखळीशी जोडली जायला हवी, अशी संकल्पना मोदी यांनी मांडली. मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)