शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

पोटाचे पाहावे की संघटनेचे ऐकावे...!

By admin | Updated: October 22, 2014 05:54 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़

अहमदनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़ ‘संघटनेचे ऐकावे की पोटाचे पहावे’ अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे़ राज्यातील साडेबारा लाख ऊस तोडणी कामगारांची रोजीरोटी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून आहे़ तर साखर कारखान्यांचा गळीत हंगामही कामगारांच्या कष्टातूनच पूर्णत्वास जातो़ शासन मात्र, कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संप लांबला आहे़ शासनासोबतचा दरवाढीचा करार संपुष्टात आला असून, आता नव्याने लवाद नेमून दरवाढ करावी यासह संघटनेने १५ मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत़ दोन महिन्यापूर्वी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेत हा प्रश्न मार्गी लागला नाही. साखर कारखान्याचा चार ते साडेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण करून गावाकडे शेती करण्यासाठी कामगार परतत असतात़ कारखाने उशिरा सुरू झाले तर गळीत हंगामही एक महिना लांबू शकतो़ शासनाने ठरविले तर सर्व मागण्या पूर्ण होऊ शकतील़ राज्यातील सर्व मुकादम संपावर ठाम आहेत़ मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही़ पाथर्डी तालुक्यातील कामगारही बाहेर जाऊ देणार नाही, असे कामगार संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब धायतडक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)