शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पोटाचे पाहावे की संघटनेचे ऐकावे...!

By admin | Updated: October 22, 2014 05:54 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़

अहमदनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़ ‘संघटनेचे ऐकावे की पोटाचे पहावे’ अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे़ राज्यातील साडेबारा लाख ऊस तोडणी कामगारांची रोजीरोटी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून आहे़ तर साखर कारखान्यांचा गळीत हंगामही कामगारांच्या कष्टातूनच पूर्णत्वास जातो़ शासन मात्र, कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संप लांबला आहे़ शासनासोबतचा दरवाढीचा करार संपुष्टात आला असून, आता नव्याने लवाद नेमून दरवाढ करावी यासह संघटनेने १५ मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत़ दोन महिन्यापूर्वी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेत हा प्रश्न मार्गी लागला नाही. साखर कारखान्याचा चार ते साडेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण करून गावाकडे शेती करण्यासाठी कामगार परतत असतात़ कारखाने उशिरा सुरू झाले तर गळीत हंगामही एक महिना लांबू शकतो़ शासनाने ठरविले तर सर्व मागण्या पूर्ण होऊ शकतील़ राज्यातील सर्व मुकादम संपावर ठाम आहेत़ मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही़ पाथर्डी तालुक्यातील कामगारही बाहेर जाऊ देणार नाही, असे कामगार संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब धायतडक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)