शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोटाचे पाहावे की संघटनेचे ऐकावे...!

By admin | Updated: October 22, 2014 05:54 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़

अहमदनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़ ‘संघटनेचे ऐकावे की पोटाचे पहावे’ अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे़ राज्यातील साडेबारा लाख ऊस तोडणी कामगारांची रोजीरोटी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून आहे़ तर साखर कारखान्यांचा गळीत हंगामही कामगारांच्या कष्टातूनच पूर्णत्वास जातो़ शासन मात्र, कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संप लांबला आहे़ शासनासोबतचा दरवाढीचा करार संपुष्टात आला असून, आता नव्याने लवाद नेमून दरवाढ करावी यासह संघटनेने १५ मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत़ दोन महिन्यापूर्वी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेत हा प्रश्न मार्गी लागला नाही. साखर कारखान्याचा चार ते साडेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण करून गावाकडे शेती करण्यासाठी कामगार परतत असतात़ कारखाने उशिरा सुरू झाले तर गळीत हंगामही एक महिना लांबू शकतो़ शासनाने ठरविले तर सर्व मागण्या पूर्ण होऊ शकतील़ राज्यातील सर्व मुकादम संपावर ठाम आहेत़ मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही़ पाथर्डी तालुक्यातील कामगारही बाहेर जाऊ देणार नाही, असे कामगार संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब धायतडक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)