शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोकणाची नजर मुंबईकडे

By admin | Updated: February 16, 2017 00:28 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला.

वसंत भोसले / कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईचे वारे कोकणातून वाहणाऱ्या प्रदेशावर झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा यांची रस्सीखेच अधिकच ताणली गेली, तर त्याचा परिणाम सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला संधी मिळवून देण्यात होईल, तर रत्नागिरीत मोठे कोण, शिवसेना की भाजपा हे ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नारायण राणे यांच्या वर्चस्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. रत्नागिरीत आजवर युती करून लढलेली शिवसेना आणि भाजपा प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने, या दोन पक्षांमध्येच अधिक रस्सीखेच रंगली आहे. त्यात शिवसेनेतील अनेक नाराज भाजपाच्या वळचणीला आल्यामुळे या लढतींमध्ये अधिक रंगत आली आहे. गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाची आघाडी केली असली, तरी आतापर्यंतच्या टप्प्यात ही आघाडी अजून पिछाडीवरच आहे.गतवेळी ५७ पैकी ३३ जागा शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात पडल्या होत्या. त्यात शिवसेनेचा वाटा २५ जागांचा, तर भाजपाचा वाटा केवळ आठ जागांचा होता. मात्र, नगर परिषद निवडणुकीतील यशामुळे भाजपाने जिल्हा परिषदेतही स्वबळ आजमाविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नाराजांची मोट बांधण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक टक्कर ही भाजपाकडूनच दिली जाणार आहे.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची बाजू काहीशी तोकडी झाली आहे. गतवेळी चिपळूण तालुक्यात ९ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राष्ट्रवादीची ताकद पणाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मात्र, अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी मागे पडली आहे. राजापूर तालुक्यात सक्षम असलेली काँग्रेस जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र दुबळी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीकडून फार मोठ्या करिश्म्याची अपेक्षा नाही.