शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोकणाची नजर मुंबईकडे

By admin | Updated: February 16, 2017 00:28 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला.

वसंत भोसले / कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईचे वारे कोकणातून वाहणाऱ्या प्रदेशावर झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा यांची रस्सीखेच अधिकच ताणली गेली, तर त्याचा परिणाम सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला संधी मिळवून देण्यात होईल, तर रत्नागिरीत मोठे कोण, शिवसेना की भाजपा हे ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नारायण राणे यांच्या वर्चस्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. रत्नागिरीत आजवर युती करून लढलेली शिवसेना आणि भाजपा प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने, या दोन पक्षांमध्येच अधिक रस्सीखेच रंगली आहे. त्यात शिवसेनेतील अनेक नाराज भाजपाच्या वळचणीला आल्यामुळे या लढतींमध्ये अधिक रंगत आली आहे. गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाची आघाडी केली असली, तरी आतापर्यंतच्या टप्प्यात ही आघाडी अजून पिछाडीवरच आहे.गतवेळी ५७ पैकी ३३ जागा शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात पडल्या होत्या. त्यात शिवसेनेचा वाटा २५ जागांचा, तर भाजपाचा वाटा केवळ आठ जागांचा होता. मात्र, नगर परिषद निवडणुकीतील यशामुळे भाजपाने जिल्हा परिषदेतही स्वबळ आजमाविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नाराजांची मोट बांधण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक टक्कर ही भाजपाकडूनच दिली जाणार आहे.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची बाजू काहीशी तोकडी झाली आहे. गतवेळी चिपळूण तालुक्यात ९ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राष्ट्रवादीची ताकद पणाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मात्र, अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी मागे पडली आहे. राजापूर तालुक्यात सक्षम असलेली काँग्रेस जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र दुबळी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीकडून फार मोठ्या करिश्म्याची अपेक्षा नाही.