शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोकणाची नजर मुंबईकडे

By admin | Updated: February 16, 2017 00:28 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला.

वसंत भोसले / कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईचे वारे कोकणातून वाहणाऱ्या प्रदेशावर झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा यांची रस्सीखेच अधिकच ताणली गेली, तर त्याचा परिणाम सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला संधी मिळवून देण्यात होईल, तर रत्नागिरीत मोठे कोण, शिवसेना की भाजपा हे ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नारायण राणे यांच्या वर्चस्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. रत्नागिरीत आजवर युती करून लढलेली शिवसेना आणि भाजपा प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने, या दोन पक्षांमध्येच अधिक रस्सीखेच रंगली आहे. त्यात शिवसेनेतील अनेक नाराज भाजपाच्या वळचणीला आल्यामुळे या लढतींमध्ये अधिक रंगत आली आहे. गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाची आघाडी केली असली, तरी आतापर्यंतच्या टप्प्यात ही आघाडी अजून पिछाडीवरच आहे.गतवेळी ५७ पैकी ३३ जागा शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात पडल्या होत्या. त्यात शिवसेनेचा वाटा २५ जागांचा, तर भाजपाचा वाटा केवळ आठ जागांचा होता. मात्र, नगर परिषद निवडणुकीतील यशामुळे भाजपाने जिल्हा परिषदेतही स्वबळ आजमाविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नाराजांची मोट बांधण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक टक्कर ही भाजपाकडूनच दिली जाणार आहे.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची बाजू काहीशी तोकडी झाली आहे. गतवेळी चिपळूण तालुक्यात ९ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राष्ट्रवादीची ताकद पणाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मात्र, अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी मागे पडली आहे. राजापूर तालुक्यात सक्षम असलेली काँग्रेस जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र दुबळी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीकडून फार मोठ्या करिश्म्याची अपेक्षा नाही.