शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या!

By admin | Updated: February 15, 2016 02:12 IST

अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे आवाहन.

विवेक चांदूरकर/वाशिम: जिल्हय़ात आयोजित ३३ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन अत्यंत उत्कृष्ट पार पडले असून, एवढय़ावरच न थांबता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रजत वर्षाला सर्मपित शहरातील अकोला नाका परिसरातील जैन भवन येथे १४ फेब्रुवारी रोजी ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविचंद्र हडसनकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आमदार सुरेश इंगळे, राजेंद्र अहिरे, पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे, मधुकर जुमडे, डॉ. सिद्धार्थ देवळे, माजी आमदार खडसे, डॉ. कृष्णा किरवले, दौलत हिवराळे, सिद्धार्थ जुमळे, शांताबाई मोरे, विलास कटारे, हरिश्‍चंद्र पोकळे, खा. की. वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, की अस्मितादर्श साहित्य संमेलन म्हणजे कार्यशाळा असते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे गांभीर्य मांडण्यात येते. आमचं साहित्य मनोरंजनासाठी नसून, रंजनवादी साहित्याचे बोट कधीच न धरता बाबासाहेबांच्या वैचारिक धनाकडे वळा, असा सल्लाही त्यांनी नवोदित साहित्यिकांना दिला. बाबासाहेबांचे मूलभूत विचार मांडण्यासाठीच अस्मिातादर्श चळवळ सुरू झाली. अस्मितेचा आरसा म्हणजे अस्मितादर्श असून, ही चळवळ सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संयोजन समितीतील पदाधिकारी व या संमेलनाच्या आयोजनासाठी झटत असलेल्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये संयोजन समितीचे पा. उ. जाधव, महेंद्र ताजणे, शेषराव धांडे, अनंत जुमळे, अरविंद उचित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे संपादक प्रा. मोहन सिरसाट व दीपक ढोले यांचाही सत्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत योगदान देणार्‍यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन अनंतकुमार जुमडे यांनी केले तर आभार महेंद्र ताजने यांनी मानले. यावेळी विविध ठरावांचेही वाचन करण्यात आले.