शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

बाबासाहेबांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या!

By admin | Updated: February 15, 2016 02:12 IST

अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे आवाहन.

विवेक चांदूरकर/वाशिम: जिल्हय़ात आयोजित ३३ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन अत्यंत उत्कृष्ट पार पडले असून, एवढय़ावरच न थांबता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रजत वर्षाला सर्मपित शहरातील अकोला नाका परिसरातील जैन भवन येथे १४ फेब्रुवारी रोजी ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविचंद्र हडसनकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आमदार सुरेश इंगळे, राजेंद्र अहिरे, पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे, मधुकर जुमडे, डॉ. सिद्धार्थ देवळे, माजी आमदार खडसे, डॉ. कृष्णा किरवले, दौलत हिवराळे, सिद्धार्थ जुमळे, शांताबाई मोरे, विलास कटारे, हरिश्‍चंद्र पोकळे, खा. की. वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, की अस्मितादर्श साहित्य संमेलन म्हणजे कार्यशाळा असते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे गांभीर्य मांडण्यात येते. आमचं साहित्य मनोरंजनासाठी नसून, रंजनवादी साहित्याचे बोट कधीच न धरता बाबासाहेबांच्या वैचारिक धनाकडे वळा, असा सल्लाही त्यांनी नवोदित साहित्यिकांना दिला. बाबासाहेबांचे मूलभूत विचार मांडण्यासाठीच अस्मिातादर्श चळवळ सुरू झाली. अस्मितेचा आरसा म्हणजे अस्मितादर्श असून, ही चळवळ सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संयोजन समितीतील पदाधिकारी व या संमेलनाच्या आयोजनासाठी झटत असलेल्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये संयोजन समितीचे पा. उ. जाधव, महेंद्र ताजणे, शेषराव धांडे, अनंत जुमळे, अरविंद उचित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे संपादक प्रा. मोहन सिरसाट व दीपक ढोले यांचाही सत्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत योगदान देणार्‍यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन अनंतकुमार जुमडे यांनी केले तर आभार महेंद्र ताजने यांनी मानले. यावेळी विविध ठरावांचेही वाचन करण्यात आले.