शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘बेळगाव’च पाहिज

By admin | Updated: October 21, 2014 00:30 IST

‘काळा दिन’ पाळणारच : महाराष्ट्र एकीकरण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा े

बेळगाव : केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या बेळगावी नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी १ नोव्हेंबरपासून बेळगाव शहराचे बेळगावी असे कन्नड भाषेच्या शब्दावरून उच्चार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या राजपत्रात बेळगावी अशी नोंद करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मराठी भाषिकांनी केंद्र व कर्नाटक सरकारच्या निर्णयास विरोध व्यक्त केला. मध्यवर्र्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९५३ च्या केंद्राच्या कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शहराचे नामकरण करताना खास कारणाशिवाय बदल करता येत नाही, तसेच शहराचे नाव ऐतिहासिक असेल, तर ते बदलताही येत नाही आणि कोणत्याही शहराचे नाव बदलताना भाषिक तेढ निर्माण झाल्यास ते बदलता येत नाही. केंद्र सरकारने या तत्त्वांचे उल्लंघन करून बेळगावी नामकरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नामकरण रद्द करावे आणि बेळगाव असेच नाव पूर्ववत ठेवावे.सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना बेळगावचे नामकरण केल्याचे सुप्रीम कोर्टातील वकिलांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाणार असून, कायदेशीर लढाई करण्याचे संकेतदेखील एकीकरण समितीने दिले आहेत.‘काळा दिन’ पाळणारचएकीकरण समितीच्या काही मोजक्या नेत्यांना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी दोन आमदारांसह एकीकरण समितीच्या नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर हा दिन ‘काळा दिन’ म्हणून साजरा करू नका, दुसऱ्या दिवशी साजरा करा, अशी सूचना केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी ‘आपण १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून साजरा करणारच’ असे ठणकावून सांगितले. कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भीतीने मोर्चामध्ये मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेले महापौर महेश नाईक मात्र गैरहजर होते, हा चर्चेचा विषय होता. बेळगावी नामांतर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी मोर्चा काढला. एकीकरण समितीच्या नेत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.