शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘बेळगाव’च पाहिज

By admin | Updated: October 21, 2014 00:30 IST

‘काळा दिन’ पाळणारच : महाराष्ट्र एकीकरण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा े

बेळगाव : केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या बेळगावी नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी १ नोव्हेंबरपासून बेळगाव शहराचे बेळगावी असे कन्नड भाषेच्या शब्दावरून उच्चार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या राजपत्रात बेळगावी अशी नोंद करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मराठी भाषिकांनी केंद्र व कर्नाटक सरकारच्या निर्णयास विरोध व्यक्त केला. मध्यवर्र्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९५३ च्या केंद्राच्या कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शहराचे नामकरण करताना खास कारणाशिवाय बदल करता येत नाही, तसेच शहराचे नाव ऐतिहासिक असेल, तर ते बदलताही येत नाही आणि कोणत्याही शहराचे नाव बदलताना भाषिक तेढ निर्माण झाल्यास ते बदलता येत नाही. केंद्र सरकारने या तत्त्वांचे उल्लंघन करून बेळगावी नामकरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नामकरण रद्द करावे आणि बेळगाव असेच नाव पूर्ववत ठेवावे.सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना बेळगावचे नामकरण केल्याचे सुप्रीम कोर्टातील वकिलांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाणार असून, कायदेशीर लढाई करण्याचे संकेतदेखील एकीकरण समितीने दिले आहेत.‘काळा दिन’ पाळणारचएकीकरण समितीच्या काही मोजक्या नेत्यांना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी दोन आमदारांसह एकीकरण समितीच्या नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर हा दिन ‘काळा दिन’ म्हणून साजरा करू नका, दुसऱ्या दिवशी साजरा करा, अशी सूचना केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी ‘आपण १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून साजरा करणारच’ असे ठणकावून सांगितले. कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भीतीने मोर्चामध्ये मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेले महापौर महेश नाईक मात्र गैरहजर होते, हा चर्चेचा विषय होता. बेळगावी नामांतर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी मोर्चा काढला. एकीकरण समितीच्या नेत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.