शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

ऊसतोड कामगारांची लगबग

By admin | Updated: November 3, 2016 01:43 IST

दारूंब्रे, कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दिवाळी पाडव्यापासून सुरू झाला

शिरगाव : दारूंब्रे, कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दिवाळी पाडव्यापासून सुरू झाला असून, ऊसतोड करण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून ऊसतोड कामगार कारखाना परिसरात दाखल होत आहेत. काही मुकादम यांनी तर ऐन दिवाळीतच कामगारांना कारखान्यावर आणल्याने या कामगारांना आपली दिवाळी रस्त्यावरच साजरी करण्याची वेळ आली आहे. या वर्षीचा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दिवाळीनंतरच सुरू करण्याचे राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे बहुतांश ऊसतोड कामगारांना या वर्षीची दिवाळी घरी साजरी करता आली. गेल्या अनेक वर्षांपासून या उसतोड कामगारांना दिवाळी उसाच्या फडातच साजरी करावी लागत होती.ऊसतोड कामगारांमध्ये बहुतांश कामगार हे प्रामुख्याने मराठवाडा आणि खानदेशातील आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूर, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, नांदेड आदी जिल्ह्यांतील ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने आहेत. या वर्षी पावसाने या भागात दमदार हजेरी लावल्याने येथील कामगार आपल्या शेतीतील कामे उरकण्याकडे लक्ष देत आहेत. दिवाळीच्या अगोदरच आपल्या शेतात आलेले पीक काढून घेऊन उर्वरित पीक कोणाकडे तरी वाटणीवर सांभाळण्यास देऊन हे कामगार ऊसतोडणीच्या कामावर दाखल होत आहेत. मागील वर्षी दुष्काळात होरपळलेल्या या कामगारांना अधिकाधिक ऊसतोडणी करून जास्तीत जास्त पैसा मिळवून आपली परिस्थिती सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.सध्या कारखाना परिसरात ऊसतोड कामगार बैलगाडी, टायर गाडी, ट्रक, ट्रॅक्टर आदीद्वारे दाखल होत असल्याने कामगारांमुळे परिसर गजबजला आहे. सर्वजण राहण्यासाठी झोपड्या उभारण्याच्या कामात व्यस्त दिसत आहेत. (वार्ताहर)>उत्साह : संसार मांडण्याची धांदल काही कामगार नुकतेच दाखल झाले असून, झोपडी पूर्ण होईपर्यंत त्यांचा संसार हा उघड्यावर मांडून साहित्य ठेवण्याच्या कामाची लगबग दिसत आहे. कारखान्याचे अधिकाऱ्यांनी समजावून घेऊन लवकरात लवकर ऊसतोड चालू करावी.चांगला फड तोडणीसाठी मिळावा अन्यथा आमच्या बैलांचा खाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी मागणी काही कामगारांनी केली. या कामगारांमध्ये ऊसतोडणीबाबत चांगलाच उत्साह असल्याचे दिसत आहे.