शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

By admin | Updated: September 1, 2016 19:26 IST

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 1 - जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात लाभक्षेत्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. म्हणून जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता पावसाची ओढ पडल्यावरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. त्यात लाभक्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून तातडीने खरीपाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माजलगाव धरणात साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रासाठीही ५ दलघमी पाणी सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) कार्यालयाने जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी केली होती. त्यानुसार २ सप्टेबर रोजी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार होते.

मात्र लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमधील बहुतेक ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. या पार्श्वभूमिवर आता कडा कार्यालयाने जायकवाडीतून खरीपासाठी शुक्रवारी पाणी सोडण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेले आहे. त्यानुसार लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जायकवाडीतून पाणी मिळणार आहे. परंतु ते आत्ताच देण्याऐवजी आणखी काही दिवसांनी सोडले जाणार आहे.जायकवाडीतून माजलगाव धरणातही साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राला ५ दलघमी पाणी दिले जाणार आहे. माजलगावसाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून तर परळीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावे लागते. खरीपासाठी दोन्ही कालवे सुरु करण्यात येणार असल्यामुळे माजलगाव आणि परळीसाठीही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र आता खरीपाची पाणी पाळी लांबल्यामुळे माजलगाव आणि परळीला नंतरच पाणी सोडण्यात येणार आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु आता काही भागात पाऊस झाला आहे. सध्या पिकांसाठी पाण्याची तेवढी गरज राहिलेली नाही. म्हणून पाणी सोडणे पुढे ढकलले आहे. आणखी काही दिवसानंतर किंवा पावसाची ओढ पडल्यावर लगेचच जायकवाडीतून पाणी सोडले जाईल.- संजय भर्गोदेव, प्रभारी अधीक्षक अभियंता, कडा