शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

By admin | Updated: September 1, 2016 19:26 IST

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 1 - जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात लाभक्षेत्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. म्हणून जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता पावसाची ओढ पडल्यावरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. त्यात लाभक्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून तातडीने खरीपाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माजलगाव धरणात साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रासाठीही ५ दलघमी पाणी सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) कार्यालयाने जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी केली होती. त्यानुसार २ सप्टेबर रोजी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार होते.

मात्र लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमधील बहुतेक ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. या पार्श्वभूमिवर आता कडा कार्यालयाने जायकवाडीतून खरीपासाठी शुक्रवारी पाणी सोडण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेले आहे. त्यानुसार लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जायकवाडीतून पाणी मिळणार आहे. परंतु ते आत्ताच देण्याऐवजी आणखी काही दिवसांनी सोडले जाणार आहे.जायकवाडीतून माजलगाव धरणातही साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राला ५ दलघमी पाणी दिले जाणार आहे. माजलगावसाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून तर परळीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावे लागते. खरीपासाठी दोन्ही कालवे सुरु करण्यात येणार असल्यामुळे माजलगाव आणि परळीसाठीही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र आता खरीपाची पाणी पाळी लांबल्यामुळे माजलगाव आणि परळीला नंतरच पाणी सोडण्यात येणार आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु आता काही भागात पाऊस झाला आहे. सध्या पिकांसाठी पाण्याची तेवढी गरज राहिलेली नाही. म्हणून पाणी सोडणे पुढे ढकलले आहे. आणखी काही दिवसानंतर किंवा पावसाची ओढ पडल्यावर लगेचच जायकवाडीतून पाणी सोडले जाईल.- संजय भर्गोदेव, प्रभारी अधीक्षक अभियंता, कडा