शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

भाजपसाठी पल्ला लांबच लांब!

By admin | Updated: February 9, 2017 22:19 IST

कुठेही बहुमत नाही : चार ठिकाणी शून्य, सोळा जिल्हा परिषदेमध्ये केवळ एक आकडी सदस्य

वसंत भोसले-- कोल्हापूर --केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदांच्या सत्तेवर मांड टाकण्यासाठी लांबच्या लांब पल्ला गाठावा लागणार आहे. राज्यातील ३४ पैकी २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार ठिकाणी भाजपने गत निवडणुकीत खातेही उघडले नव्हते तर सोळा जिल्हा परिषदेतील त्यांचे संख्याबळ केवळ एक आकडीच होते. स्वबळावर एकाही जिल्हा परिषदेत बहुमताने सत्ता नव्हती, केवळ पाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप बहुमताजवळ गेला होता.राज्यातील पंचवीसपैकी पंधरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपच्या प्रचाराची धुरा स्वीकारून जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातून निवडणुकीचा धडाकेबाज प्रचार सुरू केला आहे. दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीस होणाऱ्या दहा जिल्हा परिषदांच्या अर्जांची भरती झाली आहे. सोमवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होऊन तेथेही प्रचाराचा धुरळा उडणार आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यातील चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस होती. त्यात भाजपने चौथ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर मजल मारल्याने जिल्हा परिषदांची सत्ताही हस्तगत करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.बीडमध्ये ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीशी टक्कर देत ५९ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीने ३० जागा जिंकून बहुमताचा काठ गाठला होता. जालन्यात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रभाव राहिला होता. तेथे ५५ पैकी १५ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला १६ तर शिवसेनेनेही १५ जागा जिंकल्या होत्या. चंद्रपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तेथे ५७ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. कॉँग्रेस २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला होता.वर्धामध्ये ५१ पैकी १७ जागा भाजपने पटकावल्या होत्या. नागपूर पाठोपाठ विदर्भातील भाजपची ही चांगली कामगिरी होती. कॉँग्रेसनेही १७ जागा जिंकल्या होत्या. एकनाथ खडसे यांचा दबदबा असलेल्या जळगावमध्ये भाजप बहुमतापासून दूर राहिला होता. राष्ट्रवादीशी टक्कर देत भाजपने ६८ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० जागा तर कॉँग्रेस १० तर शिवसेनेने १५ जागा पटकावल्या होत्या. या पाच जिल्हा परिषदांमध्येच भाजपने मुसंडी मारली होती.गत निवडणुकीच्या निकालाची ही आकडेवारी पाहता भाजपला खूपच लांबचा पल्ला गाठायचा आहे. जिल्हा परिषदांच्या राजकारणावर पकड असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सर्वत्र लागलेली गळती, कॉँग्रेसमधील नेत्यांची गटबाजी आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे असलेले दुर्लक्ष अशा पार्श्वभूमीवर ही लढत होणार आहे. त्यात भाजपला झेंडा रोवण्याची संधी आहे, पण टप्पाही मोठा आणि लांब आहे. कारण भाजपची ताकद अनेक ठिकाणी मर्यादित आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून आलेल्या अनेक स्थानिक नेत्यांच्या बळावरच ही लढाई अनेक ठिकाणी लढताना भाजप दिसतो आहे.भाजपा तिसऱ्या स्थानावर२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप तिसऱ्या स्थानावर होता. पंचवीसपैकी केवळ चंद्रपूर (१८), वर्धा (१७), बीड (२०), जालना (१५) आणि जळगाव (२३) या पाचच जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्तेपर्यंत मजल गेली होती. एकाही ठिकाणी बहुमत मिळाले नव्हते. सातारा, सांगली, सोलापूर आणि हिंगोलीत खातेही उघडले नव्हते. उर्वरित सोळा जिल्हा परिषदांमध्ये केवळ एक आकडी संख्येवरच भाजप राहिला होता. त्यात रायगड (१), रत्नागिरी (७), सिंधुदुर्ग (३), नाशिक (४), बुलढाणा (४), यवतमाळ (४), अमरावती (९), गडचिरोली (८), पुणे (३), कोल्हापूर (१), नगर (६), औरंगाबाद (६), परभणी (२), उस्मानाबाद (२), नांदेड (४), लातूर (८) या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.