शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

लांब पल्ल्याच्या रेल्वे १६ तास उशिराने

By admin | Updated: August 29, 2016 23:15 IST

प्रवाशांचे हाल : त्रिवेंद्रमजवळ मंगळुरु एक्स्प्रेसचे डबे घसरल्याचा परिणाम

रत्नागिरी : केरळमधील त्रिवेंद्रमजवळ रविवारी पहाटे मंगळुरू एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वे मार्गावरून एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ ते १६ तास उशिराने धावत आहेत. बिघडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सर्व एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी आणखी चार दिवस तरी लागण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेमार्गावरून त्रिवेंद्रमला जाणाऱ्या मंगळुरू एक्स्प्रेसचे सहा डबे रविवारी पहाटे रुळावरून घसरून अपघात झाला होता. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. मार्ग सुरळीत करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. या अपघातानंतर रविवारी केरळमधून मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. सोमवारीही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. त्यामुळे रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक आठ तासांसाठी पुढे ढकलले आहे.सोमवारी केरळहून रत्नागिरीत सकाळी ७ वाजता येणारी गरीबरथ एक्स्प्रेस १५ तास उशिराने धावत आहे. रत्नागिरीत सकाळी ९ वाजता येणारी पोरबंदर एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. सकाळी ६.१० वाजता येणारी मंगला एक्स्प्रेस १८ तास उशिराने येत आहे. सकाळी ११ वाजता येणारी नेत्रावती एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. दुपारी ३.१० वाजता येणारी एर्नाकुलम-अजमेर मरूसागर एक्स्प्रेस १२ तास उशिराने धावत आहे. या गाड्यांचे वेळापत्रक नियमित होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मुंबई-मडगाव सेवा मात्र सुरळीतलांब पल्ल्याच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून जरी उशिराने धावत असल्या तरी मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत. या गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल झाला आहे. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्या थोड्या उशिराने धावत आहेत.गणेशोत्सवात विघ्न नकोगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असल्याने तोवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत न झाल्यास मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर गणेशभक्तांचा अधिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वाहतुकीत गोंधळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.