शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

लांब पल्ल्याच्या रेल्वे १६ तास उशिराने

By admin | Updated: August 29, 2016 23:15 IST

प्रवाशांचे हाल : त्रिवेंद्रमजवळ मंगळुरु एक्स्प्रेसचे डबे घसरल्याचा परिणाम

रत्नागिरी : केरळमधील त्रिवेंद्रमजवळ रविवारी पहाटे मंगळुरू एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वे मार्गावरून एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ ते १६ तास उशिराने धावत आहेत. बिघडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सर्व एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी आणखी चार दिवस तरी लागण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेमार्गावरून त्रिवेंद्रमला जाणाऱ्या मंगळुरू एक्स्प्रेसचे सहा डबे रविवारी पहाटे रुळावरून घसरून अपघात झाला होता. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. मार्ग सुरळीत करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. या अपघातानंतर रविवारी केरळमधून मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. सोमवारीही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. त्यामुळे रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक आठ तासांसाठी पुढे ढकलले आहे.सोमवारी केरळहून रत्नागिरीत सकाळी ७ वाजता येणारी गरीबरथ एक्स्प्रेस १५ तास उशिराने धावत आहे. रत्नागिरीत सकाळी ९ वाजता येणारी पोरबंदर एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. सकाळी ६.१० वाजता येणारी मंगला एक्स्प्रेस १८ तास उशिराने येत आहे. सकाळी ११ वाजता येणारी नेत्रावती एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. दुपारी ३.१० वाजता येणारी एर्नाकुलम-अजमेर मरूसागर एक्स्प्रेस १२ तास उशिराने धावत आहे. या गाड्यांचे वेळापत्रक नियमित होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मुंबई-मडगाव सेवा मात्र सुरळीतलांब पल्ल्याच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून जरी उशिराने धावत असल्या तरी मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत. या गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल झाला आहे. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्या थोड्या उशिराने धावत आहेत.गणेशोत्सवात विघ्न नकोगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असल्याने तोवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत न झाल्यास मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर गणेशभक्तांचा अधिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वाहतुकीत गोंधळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.