शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: October 15, 2015 17:33 IST

जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. जनतेने आम्हाला कौल दिला की तुम्ही एकटे सत्ता स्थापन करू शकत नाही, युती करावीच लागेल आणि जनतेचा हा कौल आम्ही प्रमाण मानून एकत्र सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचे ध्येय स्पष्ट असल्याचे शत प्रतिशत भाजपाचा उच्चार न करता सांगितले.
शिवसेनेनं एकदिलाने जनतेची कामं करण्यासाठी पुढे यायला हवं असं सांगताना तसं झालं तर पुढील काळातही एकत्र काम करू अन्यथा जनता जो कौल देईल तो मान्य करू असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
इंदू मिलच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे यांना एक दिवस आधी निमंत्रण दिलं हा अपमान नसल्याचं मत त्यांनी मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषाच्या सन्मानासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी बाजुला ठेवायला हव्यात अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. त्या कार्यक्रमाला खुद्द मला बोलावणं नव्हतं, रावसाहेब दानवेंना बोलावणं नव्हतं असं सांगत तरी आम्ही गेलोच ना असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये युती झालेली नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक पार पडल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेऊ असे सांगत सध्यातरी स्वबलावर सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.
 
मुनगंटीवार यांच्या मुलाखतीतले मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- राज्यातील शेतक-यांच्या ताटात घास पडावा म्हणून आम्ही पेट्रोल, दारू, सिगरेटवरील कर वाढवले, जर याला कोणी पाकिटमारी म्हणत असेल, तर शेतक-यांसाठी आम्ही ही पाकिटमारी केली त्याचा मला अभिमान, आणि अशी पाकिटमारी मी पुन्हा पुन्हा करेन.
- दुष्काळ जाहीर करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा व नियम असतात. दुष्काळ जाहीर केला नसला तरी ९५० कोटी रुपये खर्च करून १४ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ रुपये किलो दराने धान्य दिले.
- विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही पण जनतेला वारंवार निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणून भाजपा-शिवसेनेने एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
- जनतेच्या हितासाठी आम्ही रोज एक निर्णय घेतो.
- बहुमत मिळेपर्यंत शिवसेनेला सहन करणार.
- आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
- बिहार निवडणूक आणि आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा संबंध नाही.
- आमचा संसार मारून, मुटकून केलेला नाही.
- निमंत्रण कधी दिलं हा मान-अपमानाचा मुद्दा होऊच शकत नाही. एक दिवस आधी दिलं तर अपमान आणि आठ दिवस आधी दिलं तर सन्मान असं होत नाही.