शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: October 15, 2015 17:33 IST

जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. जनतेने आम्हाला कौल दिला की तुम्ही एकटे सत्ता स्थापन करू शकत नाही, युती करावीच लागेल आणि जनतेचा हा कौल आम्ही प्रमाण मानून एकत्र सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचे ध्येय स्पष्ट असल्याचे शत प्रतिशत भाजपाचा उच्चार न करता सांगितले.
शिवसेनेनं एकदिलाने जनतेची कामं करण्यासाठी पुढे यायला हवं असं सांगताना तसं झालं तर पुढील काळातही एकत्र काम करू अन्यथा जनता जो कौल देईल तो मान्य करू असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
इंदू मिलच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे यांना एक दिवस आधी निमंत्रण दिलं हा अपमान नसल्याचं मत त्यांनी मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषाच्या सन्मानासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी बाजुला ठेवायला हव्यात अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. त्या कार्यक्रमाला खुद्द मला बोलावणं नव्हतं, रावसाहेब दानवेंना बोलावणं नव्हतं असं सांगत तरी आम्ही गेलोच ना असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये युती झालेली नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक पार पडल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेऊ असे सांगत सध्यातरी स्वबलावर सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.
 
मुनगंटीवार यांच्या मुलाखतीतले मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- राज्यातील शेतक-यांच्या ताटात घास पडावा म्हणून आम्ही पेट्रोल, दारू, सिगरेटवरील कर वाढवले, जर याला कोणी पाकिटमारी म्हणत असेल, तर शेतक-यांसाठी आम्ही ही पाकिटमारी केली त्याचा मला अभिमान, आणि अशी पाकिटमारी मी पुन्हा पुन्हा करेन.
- दुष्काळ जाहीर करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा व नियम असतात. दुष्काळ जाहीर केला नसला तरी ९५० कोटी रुपये खर्च करून १४ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ रुपये किलो दराने धान्य दिले.
- विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही पण जनतेला वारंवार निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणून भाजपा-शिवसेनेने एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
- जनतेच्या हितासाठी आम्ही रोज एक निर्णय घेतो.
- बहुमत मिळेपर्यंत शिवसेनेला सहन करणार.
- आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
- बिहार निवडणूक आणि आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा संबंध नाही.
- आमचा संसार मारून, मुटकून केलेला नाही.
- निमंत्रण कधी दिलं हा मान-अपमानाचा मुद्दा होऊच शकत नाही. एक दिवस आधी दिलं तर अपमान आणि आठ दिवस आधी दिलं तर सन्मान असं होत नाही.