शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

एक अकेली ‘सिंह’

By admin | Updated: October 26, 2014 00:19 IST

पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला

अपुरे मनुष्यबळ : बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन नरेश डोंगरे - नागपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला जाऊ शकतो. होय, निवडणुकांची रणधुमाळी असू दे की, व्हीव्हीआयपींचे दौरे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त, त्यात तडजोड नाहीच. हे करतानाच गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांकडेही दुर्लक्ष नाहीच ! त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. त्यामुळेच आता पोलीस दलात नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केलेल्या बंदोबस्ताची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अनेक दृष्टीने संवेदनशील मानला जाणारा नागपूर जिल्हा. या जिल्ह्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान अनुचित घटना होण्याची भीती वर्तविली जात होती. निवडणुका म्हटल्या की बोगस मतदार, पैसा, दारू आणि गुंडांच्या वापराची दाट शक्यता. नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश आहे. या प्रांतातून नागपूर जिल्ह्यात हे सर्व येणार, अशी निवडणुकीच्या अगोदर जोरदार अफवा होती. त्यात विविध गावातील काही नेते आणि त्यांच्या मागेपुढे फिरणारे गुंड यांचे आपसी वैमनस्य प्रचाराच्या निमित्ताने उफाळून येण्याचीही भीती वर्तविली जात होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ‘बंदोबस्ता‘चे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे होते. नागपूर शहरातही विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. येथील वातावरणही संवेदनशील होतेच. मात्र, येथे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे ८ अधिकारी, सुमारे १ हजार पीएसआय ते पीआय आणि ५ हजार पोलीस कर्मचारी होते. साऱ्यांचीच फिल्डींग परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारले. गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली. हे करतानाच कुणाच्याही दडपणाला भीक घालायची नाही. कोणताच गैरप्रकार सहन करायचा नाही. धिटाईने वागायचे, असा सल्लावजा निर्देशही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. दोन-एक घटनांचे अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतरही हिंसक घटना घडल्या नाहीत. ‘एक अकेला शेर काफी है जंगल के लिये‘, या उक्ती प्रमाणेच डॉ. सिंग यांनी एक कर्तव्यकठोर अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा आहे, हे दाखवून दिले.