शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

एक अकेली ‘सिंह’

By admin | Updated: October 26, 2014 00:19 IST

पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला

अपुरे मनुष्यबळ : बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन नरेश डोंगरे - नागपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला जाऊ शकतो. होय, निवडणुकांची रणधुमाळी असू दे की, व्हीव्हीआयपींचे दौरे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त, त्यात तडजोड नाहीच. हे करतानाच गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांकडेही दुर्लक्ष नाहीच ! त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. त्यामुळेच आता पोलीस दलात नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केलेल्या बंदोबस्ताची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अनेक दृष्टीने संवेदनशील मानला जाणारा नागपूर जिल्हा. या जिल्ह्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान अनुचित घटना होण्याची भीती वर्तविली जात होती. निवडणुका म्हटल्या की बोगस मतदार, पैसा, दारू आणि गुंडांच्या वापराची दाट शक्यता. नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश आहे. या प्रांतातून नागपूर जिल्ह्यात हे सर्व येणार, अशी निवडणुकीच्या अगोदर जोरदार अफवा होती. त्यात विविध गावातील काही नेते आणि त्यांच्या मागेपुढे फिरणारे गुंड यांचे आपसी वैमनस्य प्रचाराच्या निमित्ताने उफाळून येण्याचीही भीती वर्तविली जात होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ‘बंदोबस्ता‘चे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे होते. नागपूर शहरातही विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. येथील वातावरणही संवेदनशील होतेच. मात्र, येथे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे ८ अधिकारी, सुमारे १ हजार पीएसआय ते पीआय आणि ५ हजार पोलीस कर्मचारी होते. साऱ्यांचीच फिल्डींग परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारले. गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली. हे करतानाच कुणाच्याही दडपणाला भीक घालायची नाही. कोणताच गैरप्रकार सहन करायचा नाही. धिटाईने वागायचे, असा सल्लावजा निर्देशही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. दोन-एक घटनांचे अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतरही हिंसक घटना घडल्या नाहीत. ‘एक अकेला शेर काफी है जंगल के लिये‘, या उक्ती प्रमाणेच डॉ. सिंग यांनी एक कर्तव्यकठोर अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा आहे, हे दाखवून दिले.