शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

लंडनचा अभियंता पोहोचला सायकलवरून थेट साताऱ्यात!

By admin | Updated: April 28, 2016 00:20 IST

भारतभ्रमण : आज साताऱ्यातून कोकण दर्शनासाठी करणार कूच

सातारा : खरंतर पेशानं इंजिनिअर असणारी माणसं यंत्रतंत्रात जास्त रमतात. मात्र, लंडन येथील एक इंजिनिअर चक्क भारतीय खेड्यांच्या प्रेमात पडला आहे. म्हणूनच तो सायकलवरून भारतीय ग्रामजीवनाचा अनुभव घेत साताऱ्यात पोहोचलाय. गुरुवारी सकाळी तो साताऱ्यातून महाबळेश्वराकडे कूच करणार असून पुढे तो सायकलवरून कोकणभ्रमंती करणार आहे.ब्रायन अ‍ॅटवूक हे लंडन येथे इंजिनिअर आहेत. सायकलवरून फिरण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. या छंदापायी ते लंडनहून सुरुवातीला श्रीलंकेत आले. त्याठिकाणी सायकलवरून ते फिरले. आता ते भारतात आले असून संपूर्ण भारतभर ते सायकलवरून फिरणार आहेत. त्यांचा सायकलप्रवास मदुराईपासून सुरू झाला असून पुढे हिमालय, नेपाळपर्यंत ते फिरणार आहेत. सध्या ते सातारा शहरात पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांचा मुक्काम असून गुरुवारी सकाळी सहा वाजता ते मेढा मार्गे कोकणात जाणार आहेत. सातारा सायकलिंग गु्रप त्यांना मेढ्यापर्यंत सोबत करणार आहे, अशी माहिती आशिष जेजुरीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.खेड्यातून प्रवास करत असताना सायकलवरून शाळेत जाणारी मुलं पाहून आनंद झाला. पण शहरात मात्र सायकल कुठे दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. काश्मिर, हिमालयात संपूर्ण उन्हाळा घालविणार असून पुन्हा दिल्लीतून राजस्थान असा सायकल प्रवास करणार आहेत. त्यानंतर पुन्हा नेपाळला विमानाने जाऊन त्याठिकाणी सायकलवरून फिरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)खेड्यातील पाहुणचारानं भारावलो...कोणत्याही देशात सायकलवरून प्रवास करताना सुरक्षेचा प्रश्न असतो. भारतातील खेड्यांमध्ये सायकलवरून प्रवास करत असताना येथील लोकांनी असुरक्षितता कधी जाणवू दिली नाही. खेड्यातील लोकांनी केलेल्या पाहुणचारामुळे भारावून गेलो. हाच जिव्हाळा लोकांनी आपल्या माणसांबरोबरही जपावा, अशी प्रतिक्रिया अ‍ॅडवूड यांनी व्यक्त केली.हायवेपेक्षा गावातून फिरायला आवडतं... भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे खेडेगावातून फिरल्याशिवाय खरा भारत कळणार नाही. यासाठी हायवेवरून न फिरता खेडेगावातून प्रवास असल्याचे ब्रायन अ‍ॅटवूड यांनी सांगितले.वाहतुकीचे नियम पाळायला हवेतभारतभर फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की, येथील वाहनचालक वाहतुकीचे नियम फारसे पाळत नाहीत. अपघातमुक्त प्रवास करायचा असेल तर प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.