शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळा २२ नोव्हेंबरला

By admin | Updated: November 15, 2015 01:23 IST

विविध वाङ्मयप्रकारांमध्ये दर्जेदार आणि अव्वल दर्जाच्या साहित्यकृती साकारणाऱ्या मराठी सारस्वतांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित मोहोर

पुणे : विविध वाङ्मयप्रकारांमध्ये दर्जेदार आणि अव्वल दर्जाच्या साहित्यकृती साकारणाऱ्या मराठी सारस्वतांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित मोहोर ग्रुप (भारत देसलडा व्हेंचर) प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ प्रदान समारंभ रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील हयात रिजेन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये सायंकाळी ७ वाजता हा साहित्य सोहळा रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, सांस्कृतिक विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित राहणार आहेत. लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.‘लोकमत’ या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या दैनिकाने मराठी साहित्यक्षेत्रामध्ये हे नवे पर्व सुरू केले आहे. सारस्वतांच्या गौरवाच्या परंपरेचे हे तिसरे वर्ष आहे. या पुरस्कार निवडीसाठी पारदर्शक प्रक्रिया राबविली जाते. वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा पुरस्कार निवडीसाठी विचार केला जातो. प्रकाशक व लेखकांनी पाठविलेल्या पुस्तकांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची निवड समिती नेमली जाते. मोठ्या थाटात आणि भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत केले जाते. या वर्षीदेखील अशाच भव्य स्वरूपात सारस्वतांचा ‘पंचतारांकित’ सन्मान केला जाणार आहे. निवड समितीने सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड निश्चित केली असून, लवकरच विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. साहित्यातील विविध वाङ्मयप्रकारांमधून पुस्तके निवडली जातात. या वर्षी कथा, कादंबरी, काव्य, ललित गद्य, ललितेतर गद्य, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य, बालसाहित्य, अनुवाद, विज्ञान अशा एकूण १० वाङ्मयप्र्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक पुरस्कार हा २५ हजार रुपयांचा असून, उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकाराला ११ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार अभ्यास आणि विचारसाधनेला अवघे आयुष्य समर्पित करून साहित्यसेवेचा वसा जपलेली ज्येष्ठ साहित्यिकांची एक मोठी परंपरा मराठी साहित्याला लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून व विचारांतून मराठी साहित्य जगताला एक नवा आयाम मिळवून दिलेला आहे. नवी दिशा दिली आहे व नवे दरवाजे खुले केले आहेत. अशा समर्पित आयुष्याला मानाचा मुजरा म्हणून एका साहित्यक्षेत्रातील अमूल्य आणि प्रदीर्घ अशा योगदानाबद्दल एका ज्येष्ठ व प्रतिभावंत साहित्यिकाला 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.