शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: कोणता आयपीएस अधिकारी तुम्हाला वाटतोय सर्वात प्रॉमिसिंग?; मत नोंदवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:45 IST

आय पी एस (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. आय पी एस (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे अधिकारीडॉ. हरी बालाजी. एन पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, मुंबईडॉ. हरी बालाजी. एन हे २०१३ चे आयपीएस अधिकारी आहेत. सप्टेंबर २०२१ पासून ते मुंबईतील महत्त्वपूर्ण आणि अतिसंवेदनशील विभागातील परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.  अमरावतीचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध सामाजिक उपक्रमांमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. बीड, पालघरमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गडचिरोलीला असताना, २०१८ साली नक्षलवादी व पोलिसांमध्ये एका घटनेदरम्यान चकमक उडाली. यावेळी डॉ. हरी बालाजी यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेत ‘ऑपरेशन नक्षल’अंतर्गत घटनास्थळी ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. विशेष म्हणजे या ऑपरेशनवेळी एकाही पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही. या कार्याबाबत त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

मल्टी मार्केटिंग स्कॅम उघडकीस आणणारे हातनुरुल हसन, पोलिस अधीक्षक, वर्धापोलिस अधीक्षक नुरुल हसन नागपूर येथे परिमंडळ १ मध्ये पाेलिस उपायुक्त म्हणून रुजू झाले. तेथे १०० कोटी रुपयांचा मल्टी मार्केटिंग स्कॅम उघडकीस आणला. या कारवाईनंतर नुरुल हसन हे नाव महाराष्ट्राला माहीत झाले. कुख्यात गुंड आबू खान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून सतत सहा महिने पाठलाग करून त्यास अटक करत संपूर्ण गँगचा सफाया केला. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी १०० गुन्हेगारांना तडीपार केले, ३० गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. ४० गुन्हेगारांवर मोक्का अंतगर्गत कारवाई केली. त्यांची पोलिस अधीक्षक म्हणून वर्धा येथे पदोन्नती झाली. त्यांनी गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावला. एमडी तस्करांना बेड्या ठोकल्या. वाळू माफियांवर सर्वात मोठी कारवाई करून ७० ते ८० ट्रक जप्त केले. क्राईम नियंत्रणासाठी क्यूआर कोड तयार केले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रपूरमधील विद्यार्थी गेले थेट एव्हरेस्टवरसुहेल शर्मा, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३, पुणे शहरसुहेल शर्मा हे मूळचे दिल्लीतील असून शालेय शिक्षण अमृतसर येथे झाले आहे. सिमला येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केले. २०१२ मध्ये ते आयपीएस झाले. त्यांची पहिली नियुक्ती चंद्रपूर येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सांगली येथे पोलिस अधीक्षक. एटीएस मुंबई येथे एक वर्ष पोलिस उपायुक्त, त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक गव्हर्न्मेंट पॉलिसी यावर एक वर्ष फलोशिप त्यांच्या नावावर आहे. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. मिशन शौर्य या उपक्रमाचे ते मेंटॉर आहेत. मिशन शौर्य हा राज्यातील पहिला असा उपक्रम होता, ज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांना एव्हरेस्टसाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही कौतुक केले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

समुपदेशनाव्दारे काम करणाऱ्या सिंघमचा दबदबातेजस्वी सातपुते, पो. उपायुक्त, पोलिस मुख्यालय २, मुंबईतेजस्वी सातपुते या २०१२ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. नोव्हेंबरपासून मुंबई पोलिस दलातील मुख्यालय २ येथे त्या पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, सोलापूर जिल्ह्यात काम करताना सातपुते त्यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून  चांगल्या व्यवसायाकडे वळवले. याअंतर्गत जवळपास ६०० पैकी ४५० कुटुंबीयांचे यशस्वीपणे नोकरी, किराणासह विविध व्यवसायात सक्रियपणे 'कायमस्वरूपी' पुनर्वसन केले आहे. ६५७ तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली. आतापर्यंत ३००० हून जास्त समुपदेशनाची सत्रे पोलिस दलातील कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने घेण्यात आली आहेत. लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख असून आपल्या कामाव्दारे त्या छाप पाडत आहेत.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

'कॉर्नर मीटिंग मॉडेल' विकसित केलेविक्रम देशमाने पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीणविक्रम देशमाने यांनी दहशतवादविरोधी पथकामध्ये अर्थात एटीएसमध्ये कार्यरत असताना अत्युत्कृष्ट कामगिरी करत गुप्तचर यंत्रणेद्वारे माहिती काढून केलेल्या तपासामुळे दहशतवादाचे मोठे नेटवर्क खंडित झाले. नागरिकांमध्ये धार्मिक सलोखा वाढीस लागावा म्हणून मालेगाव, नाशिक, मुंब्रा, ठाण्यातील राबोडी, मालवणी, मुंबईतील धारावी अशा परिसरात 'कॉर्नर मीटिंग मॉडेल' विकसित करून अंमलात आणले. याचा मोठा फायदा सामाजिक सलोखा प्रस्थापित होण्यासाठी झाला. सांगलीमधील दुहेरी हत्याकांडांचे दोन गुन्हे उघडकीस आणून १८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. चड्डी-बनियन टोळीवर झालेल्या एन्काऊंटरमुळे कारवाईमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट शोध पुरस्कार मिळाला. हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्याच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांचा त्यांनी शोध लावला आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023