शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राज्यात यंदापासून ‘लोकमान्य उत्सव’

By admin | Updated: July 24, 2016 03:25 IST

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच २०१६ हे वर्ष लोकमान्यांचे

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच २०१६ हे वर्ष लोकमान्यांचे १६० वे जयंती वर्ष आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला पुढील वर्षी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य शासनाने २०१६ व २०१७ यावर्षी ‘लोकमान्य उत्सव’ व ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ साजरा करण्याचे ठरविले आहे.‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ची सुरुवात ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ हा उपक्रम ५ ते १५ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तालुका, जिल्हा, विभाग स्तरांवर स्पर्धा आयोजित करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयांबाबत मूल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येईल व रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील, असेही तावडे म्हणाले.प्राप्त गुणांनुक्रमाच्या आधारे त्यांच्या तालुक्यामधील प्रथम, द्वितीय व तृतीय, पारितोषिक प्राप्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. बृहन्मुंबईतील सार्वजनिक मंडळांची संख्या लक्षात घेता, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना कोकण विभागातून वगळून दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभागाप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. या अभियानाला गणेशोत्सव मंडळांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)तीन स्तरांवर बक्षिसे देणारसमिती स्तरप्रथम विजेतेद्वितीय विजेतेतृतीय विजेतेविभागीय२,००,०००१,५०,०००१,००,०००जिल्हा १,००,०००७५,०००५०,०००तालुका २५,०००१५,०००१०,०००