शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

By admin | Updated: February 12, 2017 01:47 IST

चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची

- संजीव साबडेचांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ राजकीय पक्षांवर येते. बिच्चारे राजकीय पक्ष. इतरांहून आम्ही वेगळे आहोत, असं सांगणारा भाजपाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे आधी गुंडापुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारू, असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितलंय. सुभाष देशमुख गेली अनेक वर्षं सोलापुरात आणि आसपासच्या भागांत खूप चांगलं काम करताहेत. त्यांच्या लोकमंगल संस्थेतर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. त्यात हजारो जोडप्यांचे विवाह त्यांनी लावून दिले आहेत. त्यांना संसारोपयोगी वस्तू वगैरेही दिल्यात. जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर सुभाष देशमुख गुंडापुंडांना सुधारण्याचे लोकमंगल सोहळेही बहुधा आयोजित करतील. त्या सोहळ्यात वा सुधारणा शिबिरात सहभागी झालेले गुंड नंतर सुधारतील, गंगेत न्हाल्याप्रमाणे स्वच्छ, पवित्र होतील आणि सज्जनांप्रमाणे देशसेवेला लागतील. चांगले लोक राजकारणात येणार नसतील, तर असं काही करावंच लागेल की. सुभाषरावांच्या संस्थेचं नावच लोकमंगल आहे. सर्वांचं मंगल व्हावं असाच त्याचा अर्थ. त्यामुळे गुंडापुंडांचंही मंगल होईल. लोकमंगलच्या सुधारणा शिबिरातून जे बाहेर पडतील, ते नंतर कधीही गुंडगिरी करणार नाहीत, गुन्हेगारी म्हणजे काय, हेच विसरून जातील. सुभाष देशमुखांनी आणखी एक कार्य करावं, आधी गुंड असलेल्या आणि नंतर शिबिरामुळे सुधारलेल्यांवरचे सारे खटले काढून टाकावेत. गुन्हे रद्द करून टाकावेत. भले ते खुनाचे, खुनाच्या प्रयत्नाचे, खंडणीचे, फसवणुकीचे कसलेही असेनात. सुभाष देशमुख स्वत: सरकारमध्ये असल्यानं त्यांना खटले काढून घेणं शक्य होईलच. सुधारलेल्या या सज्जनांना निष्कारण कोर्टात आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळच येता कामा नये. त्यामुळे त्यांची आणि भाजपाचीच बदनामी होईल की. सुधारलेल्यांना शिक्षा होणं, हे अन्यायकारकच. लोकमंगलचे विवाह सोहळे सोलापुरात आणि मराठवाड्याच्या काही भागांतच होत असले तरी सुभाष देशमुखांनी लोकप्रतिनिधी झालेल्या गुंडांसाठी राज्यभर सुधारणा सोहळे आयोजित करायलाही हरकत नाही. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. नंतर देशभर त्यांनी विजयी गुंडांना सुधारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.पुढील निवडणुकांत भाजपानं नव्या गुंडांना उमेदवारी द्यावी, निवडून आणावं आणि त्यांना सुधारण्याचं लोकमंगल कार्य देशमुखांच्या हातूनच घडावं. अशा प्रकारे काही काळानं राजकारणात येणारा प्रत्येक जण सज्जनच असेल. भाजपाचा प्रश्नच सुटेल. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापुढे अनेक दरोडेखोरांनीही शरणागती पत्करली होती. त्या साऱ्या दरोडेखोरांनी नंतर सामान्यांसारखं जीवन जगायला सुरुवात केली होती. सुभाषराव ज्यांना सुधारणार आहेत, ते तर आधीच जिल्हा परिषद वा महापालिकेवर निवडून आलेले असतील. त्यामुळे ते थेट समाजसेवेलाच लागतील. जनतेला अशाच समाजसेवकांची, लोकप्रतिनिधींची खूप खूप खूप खूप गरज आहे. त्यामुळे सुभाषराव, लवकरात लवकर हे लोकमंगल कार्य हाती घ्याच तुम्ही. त्यांना आधी नक्की निवडूनही आणा.