शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

By admin | Updated: February 12, 2017 01:47 IST

चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची

- संजीव साबडेचांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ राजकीय पक्षांवर येते. बिच्चारे राजकीय पक्ष. इतरांहून आम्ही वेगळे आहोत, असं सांगणारा भाजपाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे आधी गुंडापुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारू, असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितलंय. सुभाष देशमुख गेली अनेक वर्षं सोलापुरात आणि आसपासच्या भागांत खूप चांगलं काम करताहेत. त्यांच्या लोकमंगल संस्थेतर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. त्यात हजारो जोडप्यांचे विवाह त्यांनी लावून दिले आहेत. त्यांना संसारोपयोगी वस्तू वगैरेही दिल्यात. जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर सुभाष देशमुख गुंडापुंडांना सुधारण्याचे लोकमंगल सोहळेही बहुधा आयोजित करतील. त्या सोहळ्यात वा सुधारणा शिबिरात सहभागी झालेले गुंड नंतर सुधारतील, गंगेत न्हाल्याप्रमाणे स्वच्छ, पवित्र होतील आणि सज्जनांप्रमाणे देशसेवेला लागतील. चांगले लोक राजकारणात येणार नसतील, तर असं काही करावंच लागेल की. सुभाषरावांच्या संस्थेचं नावच लोकमंगल आहे. सर्वांचं मंगल व्हावं असाच त्याचा अर्थ. त्यामुळे गुंडापुंडांचंही मंगल होईल. लोकमंगलच्या सुधारणा शिबिरातून जे बाहेर पडतील, ते नंतर कधीही गुंडगिरी करणार नाहीत, गुन्हेगारी म्हणजे काय, हेच विसरून जातील. सुभाष देशमुखांनी आणखी एक कार्य करावं, आधी गुंड असलेल्या आणि नंतर शिबिरामुळे सुधारलेल्यांवरचे सारे खटले काढून टाकावेत. गुन्हे रद्द करून टाकावेत. भले ते खुनाचे, खुनाच्या प्रयत्नाचे, खंडणीचे, फसवणुकीचे कसलेही असेनात. सुभाष देशमुख स्वत: सरकारमध्ये असल्यानं त्यांना खटले काढून घेणं शक्य होईलच. सुधारलेल्या या सज्जनांना निष्कारण कोर्टात आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळच येता कामा नये. त्यामुळे त्यांची आणि भाजपाचीच बदनामी होईल की. सुधारलेल्यांना शिक्षा होणं, हे अन्यायकारकच. लोकमंगलचे विवाह सोहळे सोलापुरात आणि मराठवाड्याच्या काही भागांतच होत असले तरी सुभाष देशमुखांनी लोकप्रतिनिधी झालेल्या गुंडांसाठी राज्यभर सुधारणा सोहळे आयोजित करायलाही हरकत नाही. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. नंतर देशभर त्यांनी विजयी गुंडांना सुधारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.पुढील निवडणुकांत भाजपानं नव्या गुंडांना उमेदवारी द्यावी, निवडून आणावं आणि त्यांना सुधारण्याचं लोकमंगल कार्य देशमुखांच्या हातूनच घडावं. अशा प्रकारे काही काळानं राजकारणात येणारा प्रत्येक जण सज्जनच असेल. भाजपाचा प्रश्नच सुटेल. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापुढे अनेक दरोडेखोरांनीही शरणागती पत्करली होती. त्या साऱ्या दरोडेखोरांनी नंतर सामान्यांसारखं जीवन जगायला सुरुवात केली होती. सुभाषराव ज्यांना सुधारणार आहेत, ते तर आधीच जिल्हा परिषद वा महापालिकेवर निवडून आलेले असतील. त्यामुळे ते थेट समाजसेवेलाच लागतील. जनतेला अशाच समाजसेवकांची, लोकप्रतिनिधींची खूप खूप खूप खूप गरज आहे. त्यामुळे सुभाषराव, लवकरात लवकर हे लोकमंगल कार्य हाती घ्याच तुम्ही. त्यांना आधी नक्की निवडूनही आणा.