शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वीजस्थितीत सुधारणा लोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 20, 2017 00:25 IST

राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना

मुंबई : राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना त्रास होऊ नये, याकरिता महावितरणने वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करत विविध मार्ग अवलंबविले होते. अखेर आता वीजस्थितीत सुधारणा झाली असून, राज्यातील भारनियमन कमी झाले आहे, शिवाय कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आहे, असा दावा महावितरणने केला आहे.महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत आहे. परिणामी, ७ मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. २० मे पासून कृषिपंपांनासुद्धा पूर्ववत रात्री दहा तास किंवा दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात, गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या भागासह कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते.वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती करत, कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे.महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.द्विपक्षीय कराराद्वारे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध करून, घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्स्चेंजमधून ३०० ते १ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वीजखरेदी करत, विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी १९ हजार ते १९ हजार ६०० मेगावॅट नोंदविली गेली होती.