शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वीजस्थितीत सुधारणा लोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 20, 2017 00:25 IST

राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना

मुंबई : राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना त्रास होऊ नये, याकरिता महावितरणने वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करत विविध मार्ग अवलंबविले होते. अखेर आता वीजस्थितीत सुधारणा झाली असून, राज्यातील भारनियमन कमी झाले आहे, शिवाय कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आहे, असा दावा महावितरणने केला आहे.महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत आहे. परिणामी, ७ मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. २० मे पासून कृषिपंपांनासुद्धा पूर्ववत रात्री दहा तास किंवा दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात, गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या भागासह कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते.वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती करत, कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे.महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.द्विपक्षीय कराराद्वारे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध करून, घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्स्चेंजमधून ३०० ते १ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वीजखरेदी करत, विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी १९ हजार ते १९ हजार ६०० मेगावॅट नोंदविली गेली होती.