शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

वीजस्थितीत सुधारणा लोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 20, 2017 00:25 IST

राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना

मुंबई : राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना त्रास होऊ नये, याकरिता महावितरणने वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करत विविध मार्ग अवलंबविले होते. अखेर आता वीजस्थितीत सुधारणा झाली असून, राज्यातील भारनियमन कमी झाले आहे, शिवाय कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आहे, असा दावा महावितरणने केला आहे.महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत आहे. परिणामी, ७ मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. २० मे पासून कृषिपंपांनासुद्धा पूर्ववत रात्री दहा तास किंवा दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात, गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या भागासह कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते.वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती करत, कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे.महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.द्विपक्षीय कराराद्वारे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध करून, घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्स्चेंजमधून ३०० ते १ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वीजखरेदी करत, विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी १९ हजार ते १९ हजार ६०० मेगावॅट नोंदविली गेली होती.