शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

वीजस्थितीत सुधारणा लोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 20, 2017 00:25 IST

राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना

मुंबई : राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना त्रास होऊ नये, याकरिता महावितरणने वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करत विविध मार्ग अवलंबविले होते. अखेर आता वीजस्थितीत सुधारणा झाली असून, राज्यातील भारनियमन कमी झाले आहे, शिवाय कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आहे, असा दावा महावितरणने केला आहे.महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत आहे. परिणामी, ७ मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. २० मे पासून कृषिपंपांनासुद्धा पूर्ववत रात्री दहा तास किंवा दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात, गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या भागासह कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते.वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती करत, कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे.महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.द्विपक्षीय कराराद्वारे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध करून, घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्स्चेंजमधून ३०० ते १ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वीजखरेदी करत, विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी १९ हजार ते १९ हजार ६०० मेगावॅट नोंदविली गेली होती.