शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!

By सुधीर लंके | Updated: May 23, 2019 17:45 IST

नगरला विखे जिंकले, तर जगताप यांच्या रुपाने स्वत: शरद पवार पराभूत झाले आहेत.

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच रणसंग्रामात पराभूत केले आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली खरी, मात्र त्यांच्या हाती धुपाटणे आले आहे. 

सुजय विखे हे गत तीन वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी विखे पिता-पुत्रांची मागणी होती. शरद पवार यांनी मात्र त्यास नकार दिला. राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद असून आम्हीच हा मतदारसंघ लढवू, अशी भूमिका त्यांनी घेतली. सुजय यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींनीही आतून विरोध केला. बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदारसंघात १९९१ ला पराभूत केले आहे, असे दाखले देखील पवारांनी दिले. 'दुसऱ्याच्या पोराबाळांची मी का काळजी करु' असे विधानही पवारांनी केले. 

पवारांनी नकार दिल्याने विखे यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. विखे यांची ही उमेदवारी म्हणजे थेट शरद पवार यांनाच आव्हान होते. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला असल्याने येथे आपला उमेदवार जाहीर करुन बांधणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीने घ्यायला हवी होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारीचा घोळ घातला. गत पाच वर्षे तर या पक्षाने मतदारसंघांची बांधणी केली नाहीच. पण निवडणुकीच्या २२ दिवस आधी ऐनवेळी संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. एवढ्या अल्पकाळात ते बांधणीच करु शकले नाहीत. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र, सुप्रिया सुळे, अजित पवार हे बारामती, मावळमध्ये अडकल्याने प्रचारासाठीही येऊ शकले नाहीत. कॉंग्रेसकडूनही केवळ बाळासाहेब थोरात प्रचारासाठी आले. प्रचार यंत्रणा राबविण्यातच राष्ट्रवादी कमी पडली. नगर शहर हा संग्राम जगताप यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, स्वत:च्या बालेकिल्ल्यात देखील ते फारसा प्रचार करु शकले नाहीत. या बालेकिल्ल्यातही विखेंनी मतांमध्ये आघाडी घेतली आहे. एकप्रकारे पवार यांनी जगताप यांना बळीचा बकरा केले.

विखे यांची बांधणी चांगली होती. स्वत: सुजय यांनी दोन वर्षांपूर्वीच एकप्रकारे आपली उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे त्यांचा बहुतांश प्रचार हा निवडणुकीपूर्वीच होऊन गेला होता. त्यात त्यांना सेना-भाजपची ताकद मिळाली. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या सभा त्यांनी घेतल्या. विखेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी कापली गेली. गांधी व त्यांचे समर्थक यामुळे नाराज झाले. मात्र विखे पिता-पुत्रांनी त्यांची नाराजी शमवली. भाजप-सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतले. त्यामुळे  त्यांची विजयाची गणिते सोपी झाली.

 ‘मी शरद पवार व बाळासाहेब थोरात या नेत्यांचे आभार मानतो’, अशी खोचक प्रतिक्रिया सुजय विखे यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे. या दोघांनी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला नाही म्हणूनच भाजपमध्ये जाऊन विजयी होता आले, असे या प्रतिक्रियेतून सुजय यांनी ध्वनित केले आहे. नगरला विखे जिंकले, तर जगताप यांच्या रुपाने स्वत: शरद पवार पराभूत झाले आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAhmednagarअहमदनगर