शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कल्याणहून सीएसटीपर्यंत धावणार थेट अतिजलद लोकल?

By admin | Updated: March 3, 2016 10:36 IST

मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीवरील उतारा म्हणून कल्याण,डोंबिवली, ठाणे येथून सीएसटीपर्यंत थेट अतिजलद लोकल सोडण्याचा विचार रेल्वेतर्फे करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबई रेल्वेतील गर्दी दिवसेदिवस वाढतच चालली असून सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण, डोंबिवली येथून ट्रेनमध्ये चढणे महाकठीण असते. तर घरी परततानाही चाकरमान्यांना मुलंड, ठाणे येथे उतरण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. प्रचंड गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही बरेच वाढले असून या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यावर उतारा म्हणून मध्य रेल्वेतर्फे ' अतिजलद' गाड्या चालवण्याचा विचार होत असल्याचे वृत्त आहे. 
पीक अवर्समध्ये कल्याण, डोंबिवली व ठाणे येथून अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतराने सात ते आठ अतिजलद गाड्या सोडण्याचा विचार असून त्यादृष्टीने लवकरच चाचणी करण्यात येणार आहे. मात्र यामुळे ठाण्याच्या पुढे राहणा-यांना फटका बसेल हे लक्षात घेता, आधीच्या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने त्या वेळेत आणखी दोन-तीन गाडय़ा वाढवून मधल्या स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा देण्यात येईल.
नवीन प्रस्तावानुसार कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या या थेट सीएसटी स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत. ही सेवा कितपत यशस्वी ठरु शकते याची आधी चाचपणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते सीएसटी प्रवास जलद होईल. सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये या लोकल सोडल्यास गर्दीच्या समस्येतून थोड्याफार प्रमाणात उतारा मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे. तसेच या गाड्यांना दादरला थांबा देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे समजते.