शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आयकर विभागाला दाखविला स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठेंगा!

By admin | Updated: April 12, 2017 00:38 IST

अकोला- सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयकर विभागाला ठेंगा दाखविला जात आहे.

कोट्यवधीचा टीडीएस थकविला : २६७ कोटींचे उद्दिष्ट कोलमडले!

संजय खांडेकर - अकोलासर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयकर विभागाला ठेंगा दाखविला जात आहे. अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोट्यवधीचा टीडीएस थांबवून ठेवल्याने विभागीय आयकर विभागाचे यंदाजे २६७ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट कोलमडले आहे.अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून इन्कम टॅक्स आणि टीडीएस गोळा करण्याची जबाबदारी अकोला आयकर विभागीय कार्यालयावर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांकडून आयकर विभागाला नियमित कर मिळणे क्रमप्राप्त आहे; मात्र अकोला आयकर विभागाला केंद्र शासनाच्या कार्यालयातूनच, वार्षिक कर प्राप्त होतो. त्या तुलनेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध शैक्षणिक संस्थांकडे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कोट्यवधीचा टीडीएस थकीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ आणि महावितरणकडून ही रक्कम वसूल करण्यात आयकर विभागाला यश आले असले तरी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्हा परिषदेच्या हजारो कर्मचाऱ्यांचे टीडीएस अजूनही आयकर विभागात जमा झालेले नाहीत. सोबतच तिन्ही जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा स्त्री रुग्णालयातील शेकडो कर्मचारी, अकोला महानगरपालिका, तिन्ही जिल्ह्यातील नगर परिषदांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीडीएसची थकीत २५ कोटींच्या वर आहे. चार वर्षांपर्यंतची शिथिलता आयकर विभागात क्षम्य आहे; मात्र त्यानंतर दंडात्मक कारवाईचे शस्त्र उगारण्याचे अधिकार आयकर विभागाला आहे. टीडीएस वसूल करण्याची वेगळी यंत्रणा असून, तिन्ही जिल्ह्याचे प्रमुख म्हणून वृंदा जोग कार्यरत असून, या यंत्रणेवर उपायुक्त सत्यप्रकाश नागपूर येथून नियंत्रण ठेवतात. मनुष्यबळ नसल्याने या थकीत रकमेचा आकडा मोठा असला तरी वसुलीचा आकडा मात्र वाढलेला नाही. अकोला प्राप्तीकर विभागाने गत दोन वर्षांपासून थकीत टीडीएसवर लक्ष केंद्रित करून, वसुली मोहीम राबविली. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस बजावून रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यास यश आले नाही. त्यामुळे आयकर विभागाने २६७ कोटींचे २०१६-१७ या वर्षांसाठी घेतलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. २६५ कोटींपर्यंतचेच टीडीएस उद्दिष्ट या विभागाने वसूल केले.