शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकलला ३३९३ कोटींचा तोटा

By admin | Updated: July 30, 2016 01:48 IST

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा खर्च आणि मुंबईकरांना दिली जाणारी स्वस्त दरातली मासिक पास सुविधा यामुळे वर्षभर पूर्ण क्षमतेने ही वाहतूक सुरू असली तरी मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे असे उत्तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राज्यसभेत दिले.शिवसेना नेते संजय राऊ त यांच्या मूळ प्रश्नाला उत्तर देतांना प्रभू म्हणाले, मुंबईकर लोकल प्रवाशांची भाडेआकारणी अत्याधिक सबसिडीची आहे. मुंबईकरांना मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध आहे जी अतिशय स्वस्त आहे. रेल्वेच्या द्वितीय श्रेणी प्रवासाला आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षाही ती कमी आहे. रेल्वेला या सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने ही सेवा गेल्या ३ वर्षांपासून तोट्यात आहे.- मुंबई उपनगरी लोकल वाहतुकीची प्रवासी भाडेवाढ न करता ही वाहतूक अधिक लाभदायक करण्यासाठी सरकारने विविध प्रकारची पाउले उचलली आहेत, असे स्पष्ट करतांना प्रभू म्हणाले, इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट (इएमयु)ला बोगीच्या बाहेरच्या भागावर पूर्ण जाहिराती मिळवण्याचे अधिकार. - प्रवासी बोगीत एलईडी डिस्प्ले तसेच वाणिज्यिक जाहिरातींच्या उद्घोषणाव्दारे उत्पन्न मिळवणे, पेपरलेस मोबाईल तिकिटाचे अ‍ॅप सुरू करणे, तिकिटांसाठी स्वयंचलित वेडिंग मशिन्स, अनारक्षित तिकिटांसाठी प्रवासी सुविधा केंद्र तसेच सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवा, स्मार्ट कार्ड तिकिट विक्री सुरू करणे, विनातिकिट प्रवाशांकडून सातत्याने दंडाची वसुली करण्यासाठी बॅरियर चेकिंग, रेल्वेचा रनिंग स्टाफ, वाणिज्यिक स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम कामाची सातत्याने समीक्षा, अशा काही ठळक योजना रेल्वेने राबवल्या आहेत.- मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी पर्यायी इलेव्हेटेड मार्ग उभारण्याच्या योजनेला लवकरच गती देण्यात येणार असून सर्वसाधारण व विशेष अशा दोन प्रवर्गात याची विभागणी करण्यात येणार आहे.- या लोहमार्गावरून होणाऱ्या नव्या लोकल ट्रेनच्या प्रवासी वाहतुकीचे दर थोडे अधिक असतील मात्र लोकल ट्रेन वाहतुकीवर सध्या पडणारा भार त्यामुळे काही प्रमाणात कमी होउ शकेल. विशेषत: पावसाळयात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही.- याखेरीज मुंबईत एमयुटीपी ३ योजना पूर्णत: वेगाने कार्यान्वित करण्याचा सरकारचा इरादा आहे, असे उत्तर प्रभूंनी अजय संचेती यांच्या उपप्रश्नाला दिले.