शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

लोकलला ३३९३ कोटींचा तोटा

By admin | Updated: July 30, 2016 01:48 IST

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा खर्च आणि मुंबईकरांना दिली जाणारी स्वस्त दरातली मासिक पास सुविधा यामुळे वर्षभर पूर्ण क्षमतेने ही वाहतूक सुरू असली तरी मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे असे उत्तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राज्यसभेत दिले.शिवसेना नेते संजय राऊ त यांच्या मूळ प्रश्नाला उत्तर देतांना प्रभू म्हणाले, मुंबईकर लोकल प्रवाशांची भाडेआकारणी अत्याधिक सबसिडीची आहे. मुंबईकरांना मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध आहे जी अतिशय स्वस्त आहे. रेल्वेच्या द्वितीय श्रेणी प्रवासाला आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षाही ती कमी आहे. रेल्वेला या सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने ही सेवा गेल्या ३ वर्षांपासून तोट्यात आहे.- मुंबई उपनगरी लोकल वाहतुकीची प्रवासी भाडेवाढ न करता ही वाहतूक अधिक लाभदायक करण्यासाठी सरकारने विविध प्रकारची पाउले उचलली आहेत, असे स्पष्ट करतांना प्रभू म्हणाले, इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट (इएमयु)ला बोगीच्या बाहेरच्या भागावर पूर्ण जाहिराती मिळवण्याचे अधिकार. - प्रवासी बोगीत एलईडी डिस्प्ले तसेच वाणिज्यिक जाहिरातींच्या उद्घोषणाव्दारे उत्पन्न मिळवणे, पेपरलेस मोबाईल तिकिटाचे अ‍ॅप सुरू करणे, तिकिटांसाठी स्वयंचलित वेडिंग मशिन्स, अनारक्षित तिकिटांसाठी प्रवासी सुविधा केंद्र तसेच सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवा, स्मार्ट कार्ड तिकिट विक्री सुरू करणे, विनातिकिट प्रवाशांकडून सातत्याने दंडाची वसुली करण्यासाठी बॅरियर चेकिंग, रेल्वेचा रनिंग स्टाफ, वाणिज्यिक स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम कामाची सातत्याने समीक्षा, अशा काही ठळक योजना रेल्वेने राबवल्या आहेत.- मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी पर्यायी इलेव्हेटेड मार्ग उभारण्याच्या योजनेला लवकरच गती देण्यात येणार असून सर्वसाधारण व विशेष अशा दोन प्रवर्गात याची विभागणी करण्यात येणार आहे.- या लोहमार्गावरून होणाऱ्या नव्या लोकल ट्रेनच्या प्रवासी वाहतुकीचे दर थोडे अधिक असतील मात्र लोकल ट्रेन वाहतुकीवर सध्या पडणारा भार त्यामुळे काही प्रमाणात कमी होउ शकेल. विशेषत: पावसाळयात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही.- याखेरीज मुंबईत एमयुटीपी ३ योजना पूर्णत: वेगाने कार्यान्वित करण्याचा सरकारचा इरादा आहे, असे उत्तर प्रभूंनी अजय संचेती यांच्या उपप्रश्नाला दिले.