शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी

By admin | Updated: June 19, 2017 02:41 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार असून, त्यासाठी डिजिटल साधनांची मदत घेतली जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार असून, त्यासाठी डिजिटल साधनांची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. २००८ साली केंद्रातील यूपीए सरकारने दिलेल्या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याने, अनेक गरजू शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही सावधानता बाळगत असल्याचे ते म्हणाले.कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी राज्य शासनाने एक संयुक्त समिती स्थापन केली असून, कुणाकुणाला कर्जमाफीचा लाभ द्यायचा, याचा निर्णय येत्या आठवड्याभरात घेण्यात येईल. आर्थिक सुस्थितीत असणारे, व्यावसायिक किंवा शासकीय कर्मचारी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर ११ जून रोजी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या कर्जमाफीसाठी शासनाला तब्बल २५ हजार कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या राज्यावर या निर्णयामुळे आणखी भार पडणार आहे. मात्र, ‘हा निधी उभा केला जाऊ शकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या ‘सुशासन’ विभागातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी उचलून धरली. परिणामत: त्यांनाही कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, या निर्णयामुळे कोणत्याही क्षेत्रात भाववाढीची शक्यता नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी डिजिटल साधनांचा वापर करून, कर्जमाफीमध्ये बनावट बँक खात्यांना वगळले, त्याबाबत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. आम्हीही हे मॉडेल अंगीकारण्याचा विचार करीत आहोत. या महिन्यातील कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येवरील प्रभावी उत्तर नाही. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आणण्याचे आव्हान शासनापुढे आहे. शासन एक लाख शेततळी बांधत आहे, अधिकाधिक विहिरी खोदत आहे आणि ठिबक सिंचनासाठीही प्रयत्न करीत आहे. शासनाने तब्बल २५ हजार कोटींची गुंतवणूक शेतीत केली आहे. कर्जमाफीमुळे बाधा येऊ न देता, ही कामे सातत्याने सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, असे फडणवीस म्हणाले.