शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी

By admin | Updated: June 16, 2017 00:55 IST

कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करावी लागणार आहे. गरजू शेतकरी कर्जमाफीतून सुटणार नाही आणि एकही चुकीची व्यक्ती कर्जमाफीत येणार

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करावी लागणार आहे. गरजू शेतकरी कर्जमाफीतून सुटणार नाही आणि एकही चुकीची व्यक्ती कर्जमाफीत येणार नाही, अशी यंत्रणा तयार करावी लागेल. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मागील कर्जमाफीसंबंधीचा ‘कॅग’चा अहवाल डोळ्यांत अंजन घालणारा आहे. गतवेळी काही व्यक्तींनी ८० लाखांपर्यंत रक्कम माफ करून घेतली तर काहींनी शेतकरी नसताना कर्ज माफ करून घेतल्याचे दिसून येत आहे.मागील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती कर्जमाफीचे निकष ठरवणार आहे. विविध राजकीय पक्ष व शेतकरी नेत्यांशी चर्चा करून हे निकष निश्चित करावे लागणार आहेत. निकष निश्चित झाल्यानंतर त्या निकषाच्या अनुरूप आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात फार मोठी कसरत करावी लागणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.‘लोकाभिमुख व्हा’प्रशासनाकडून कसे काम केले जाते त्यावर राज्य शासनाचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे महसूल विभागाने पारदर्शकता वाढवत गतिशील आणि लोकाभिमुख होण्याची गरज आहे. तसेच आपण शासक नसून जनतेचे सेवक आहोत, या भूमिकेतून सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अर्धन्यायिक प्रकरणे निकाली न काढल्यास कारवाईकायद्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अर्धन्यायिक प्रकरणे दाखल झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत निकाली काढण्याचे बंधन आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत या प्रकरणांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे एक वर्षाची मुदत संपून गेलेली प्रकरणे आॅक्टोबर २०१७पर्यंत निकाली काढावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे महसूल परिषदेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महसूल विभागाकडील कामाचा ताण लक्षात घेता अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नमूद केले.