शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्जमाफीचा लाभ ३६ लाख शेतकऱ्यांना

By admin | Updated: July 10, 2017 05:44 IST

सरसकट कर्जमाफी देताना जमिनीची मर्यादा न ठेवल्यामुळे राज्यातील ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरसकट कर्जमाफी देताना जमिनीची मर्यादा न ठेवल्यामुळे राज्यातील ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात दिली. कर्जमाफी आणि कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सविस्तरपणे उत्तरे दिली. ते म्हणाले, सुरुवातीला आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु इतर शेतकऱ्यांचा प्रश्न समोर आल्यानंतर आम्ही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. देशातील विविध राज्यांनी कर्जमाफी जाहीर करताना अटी घातल्या आहेत. पंजाब सरकारने ५ एकरापर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. तेलंगण सरकारने फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तर कर्नाटक सरकारने केवळ जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. तसेच आंध्र प्रदेश सरकारने दोन हेक्टरची मर्यादा घातली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.आम्ही सर्वांना सरसकट कर्जमाफी दिली, यासाठी कुठल्याही अटी ठेवल्या नाहीत. दीड लाखापर्यंतची कर्जे माफ करण्यात आली आहेत. जमिनीची मर्यादाही ठेवण्यात आली नाही. शिवाय, कर्जाचे पुनर्गठण केलेल्यांनाही याचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगत कर्जमाफीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून प्रत्येक बँक खात्याची आधार क्रमांकावरून पडताळणी करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.