शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना कर्ज; बँकांची नकारघंटा

By admin | Updated: August 11, 2015 01:14 IST

ऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून,

- विश्वास पाटील,  कोल्हापूरऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून, शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.राज्यातील लाखो शेतकऱ्यांची वाजवी व किफायतशीर मूल्याची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने १,९८३ कोटी रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. त्याचे एक वर्षाचे व्याज केंद्र शासन व चार वर्षांचे व्याज राज्य सरकार देणार आहे. परंतु मुख्यत: राष्ट्रीयीकृत बँकांचा राज्य शासनाच्या हमीवर विश्वास नसल्याने त्या कर्ज द्यायला तयार नाहीत. शनिवारी त्यासंदर्भात साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी पुण्यात निवडक कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यातील अडचणी समजून घेतल्या. २०१४-१५मध्ये १७८ कारखान्यांनी ९२९.५४ लाख टन उसाचे गाळप करून ११.२८च्या सरासरी उताऱ्याने १०४.८३ लाख टन साखर उत्पादन केले. मात्र, या हंगामात बाजारातील साखरेचे दर कोसळल्याने कारखान्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले. त्यामुळे त्यांना ‘एफआरपी’ देता आली नाही. ही रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने २३ जून २०१५ला सॉफ्ट लोन जाहीर केले. त्यानुसार १४७ कारखान्यांनी २०१३-१४मध्ये उत्पादित केलेल्या पांढऱ्या साखरेच्या ११ टक्के साठ्यावर प्रतिटन २४ हजार रुपयांप्रमाणे बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. तसा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ३० जुलैला काढला. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका राज्य शासनाच्या हमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.साखर कारखानदारीच्या कर्जाची जोखीम १५० टक्क्यांवर गेली असल्याने कारखान्यांनी एक वर्षातच कर्ज परतफेड केल्यास ते देऊ, असे बँकांचे म्हणणे आहे. संचालक मंडळाने व्यक्तिगत थकहमी दिल्याशिवाय कर्ज देणार नाही, अशीही बँक व्यवस्थापनाची भूमिका आहे. केंद्राच्या कर्ज योजनेतून राज्याला १,९८३ कोटी रुपये मिळतील, मात्र अनेक कारखान्यांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याने प्रत्यक्षात १४०० कोटीच उपलब्ध होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे किमान २,८०० कोटी रुपयांची एफआरपीची थकीत रक्कम देणे अशक्य होईल.