शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हलका झाला पोस्टाचा भार

By admin | Updated: July 12, 2014 23:15 IST

ऑनलाईन प्रणालीचा परिणाम

कारंजालाड : केन्द्र अथवा राज सरकारच्या अखत्यारितील विविध विभागाच्या नोकरी भरतीसाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग होत असल्याने पोस्ट विभागाच्या खात्यावरील ताण कमी झाला आहे. नोकर भरतीसाठी अर्ज केल्यानंतर पूर्वी परीक्षेचे प्रवेशपत्र पोस्टमनच्या सहाय्याने उमेदवारास मिळत होते. कधी कधी तर शासनाच्या विभागाच्या नोकरभरतीसाठी जाहिरात निघाल्यानंतर डाक विभागातून अर्ज करावे लागत होते. त्यामुळे पोष्टात पत्रव्यवहारांचे ढिगच ढिग लागत होते. आता मात्र सर्व विभागाची भरती प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. उमेदवारांना प्रवेश पत्र सुद्धा ई-मेलवर येत आहे. परिणामी पोस्ट खात्याचा भारत कमी झाला असून खाजगी संगणक केन्द्रावरील गर्दी मात्र वाढली आहे.

** सर्वच कामे होतात ऑनलाईन

विविध शासकीय कार्यालयाच्या नोकर भरतीसाठी निघणार्‍या जाहिरातीत अर्ज भरण्याच्या दिनांकापासून अर्ज भरण्याची शेवटची तारीख तसेच बँकेत परीक्षा शुल्क भरण्याच्या तारखा, हॉलतिकीट उमेदवारांच्या मेल आयडीवर येण्याच्या तारखा व परीक्षेच्या तारखात होणार्‍या बदलाबाबत ऑनलाईन व अर्ज बरोबर आहे किंवा नाही हे सर्व वेळेत होताना दिसते.

** पोस्टावरील दोषारोप कमी झाला

पूर्वी बर्‍याच प्रकरणात पोस्टाच्या विलंबामुळे बर्‍याचशा उमेदवारा कॉल लेटर न मिळाल्याने मुलाखतीस अथवा नोकरीस हजर राहता न येण्यासाखी प्रकरणे घडलेली आहेत. त्यामुळे पास्ट खात्याला दोष दिला जात होता. मात्र आता ऑनलाईन पद्धतीमुळे पोस्ट खात्याला दोष देणे आपोआप बंद झाले आहे. तसेच पत्रासाठी अथवा प्रवेश तिकीटासाठी आता नागरिकांना पोस्टमनची सुद्धा वाट पाहावी लागत आहे, हे विशेष.