शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

LIVE : अहमदनगर: ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: February 16, 2017 15:00 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 16  - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात ...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16  - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली असून मतदानास संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अहमदनगरमधील पांगरमल येथे बनावट दारूमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला आहे. 
 
दरम्यान आजच्या निवडणुकीतून ग्रामीण भागातील जनतेचा कौल स्पष्ट होईल. आज जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील एकूण २, ५६७ जागांकरिता ११, ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २४, ०३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार आहे. 'मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळी राज्यपातळीवर कोणत्याच पक्षांची आघाडी आणि युती झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत.
 
दरम्यान जळगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानास सुरुवात झाली असून ६७ गटांसाठी २५६ तर १३४ गटांसाठी ५२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर लातूर जिल्ह्यात १४९९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले आहे. जि. प. च्या ५८ गट आणि दहा पंचायत समितीच्या ११६ गणासांठी मतदान होत असून जि. प. ला २३१ उमेदवार तर पंचायत समितीला ४२४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 
 
LIVE UPDATES
 
जळगाव : जिल्हा परिषद निवडणूक - मतदार याद्यांमध्ये घोळ, शिरसोली गावात काही मतदार मतदानापासून वंचित.
 
परभणी : मतदान यंत्रातील बिघाडामुळे पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील केंद्र क्रं.3 वरील मतदान थांबले.
 
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील कळसा येथे जिल्हा परिषद निवडणूक मतदान केंद्राबाहेर हाणामारी. काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण.
 
अहमदनगर : पांगरमल येथे बनावट दारुमुळे 7 जणांचा मृत्यू प्रकरण, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट.
 
अहमदनगर  
  

जळगाव : आव्हाणे येथील एका मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये घोळ, घोळामुळे उमेदवारांमध्येही वाद, मतदान थांबवले.

जळगाव 

पाचोरा तालुक्यातील कु-हाड येथे मतदान केंद्राबाहेर दोन गटांत वाद, घटनास्थळी पोलीस दाखल, परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पोलिसांची प्रयत्न.

 
 
 
 
 
 
अहमदनगर 
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बजावला मतदानाचा हक्क
 
 
 
यवतमाळ
काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
 
 
चाळीसगाव तालुक्यात देवळी- तळेगांव जिल्हा परिषद गटातील अंधारी येथे एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रथम मतदान केले.
 
 

सायगाव येथील बीएसएफ जवान गोरखनाथ दिलीप जाधव यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी केले मतदान.

बुलडाणा
सकाळी 9.30 वाजेपर्यंतची टक्केवारी
 
सकाळी 11.30 वाजेपर्यंतची टक्केवारी
 
 
 
 
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844r7b