शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचाच उद्योग!

By admin | Updated: January 9, 2015 01:23 IST

‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अहमदनगर : ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावत ‘‘होय, साहित्य हे रिकामटेकड्यांचेच काम असते़ कामात व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ नेमाडे यांचे बोलणे म्हणजे शिवी नसून ओवी आहे,’’ अशी उपहासात्मक टीका डॉ़ मोरे यांनी गुरुवारी केली़डॉ़ मोरे म्हणाले, ‘‘साहित्याला उत्सवी स्वरूप असावे तरच ते लोकांना भावेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल़ साहित्य सेवा ही खऱ्या अर्थाने रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़ आपापल्या कामांत व्यस्त असणारे कधी साहित्य संमेलनात फिरकले आहेत काय, असा सवाल करीत आपापल्या कामांत व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ साहित्य सेवेसाठी वेळ द्यावा लागतो़ त्यामुळे साहित्य हे रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़’’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याबाबत ते म्हणाले, ‘‘घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे़ त्यांना वंदन करण्यासाठीच हे साहित्य संमेलन तेथे घेत आहोत़ यात वावगे काही नाही़ ज्यांना यायचे त्यांनी यावे़ पुस्तक विकण्यासाठी आणि प्रकाशकांसाठी हे साहित्य संमेलन नाही,’’ असेही डॉ़ मोरे यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी) च्विकासाच्या नावाखाली वेगळ्या राज्याची मागणी चुकीची आहे़ उद्या कोणी वेगळा देश मागेल मग काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़च्प्रत्येक जण मुलाला इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मराठी शाळा टिकविण्याची वरवर चिंता व्यक्त करतो, हे चुकीचे असल्याचे डॉ़ मोरे म्हणाले़