शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन पिंपरीला

By admin | Updated: August 10, 2015 01:26 IST

यंदाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्याचे यजमानपद

पुणे : यंदाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्याचे यजमानपद डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीला मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी ही घोषणा केली. घुमानच्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास मराठी साहित्यिक तसेच रसिकांना अनेक अडचणी आल्या होत्या. तसेच पुढच्या महिन्यात होणारे विश्व मराठी साहित्य संमेलनही अंदमान येथे होणार असल्याने महामंडळाने मध्यवर्ती ठिकाणाची निवड केली आहे. जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता या निकषांवरून संमेलनस्थळ निश्चित करण्यात आल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. या वेळी मसापचे कोषाध्यक्ष सुनील महाजन व कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.

१२ ठिकाणांहून प्रस्ताव आले होतेपंजाबमधील घुमान येथे गाजलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनानंतर ८९वे साहित्य संमेलन नेमके कुठे होणार याबाबत साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या संमेलनासाठी राज्यभरातून विक्रमी म्हणजेच एकूण १२ ठिकाणांहून प्रस्ताव आलेले होते. त्यातही पिंपरी-चिंचवडमधूनच ३ प्रस्ताव होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावींच्या आशीर्वादाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले. न भूतो न भविष्यती असे संमेलन करू. - पी.डी. पाटील, अध्यक्ष, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पिंपरीलेखक अशा प्रकारे स्वत:च्या बळावर साहित्य संमेलनाची मागणी करतो ही पहिलीच वेळ आहे. पिंपरी व डी.वाय. पाटील यांना ही संधी देण्यामागे नेमके कोणते कारण आहे? अशा प्रकारे महामंडळाने माझी व श्रीगोंदेकरांची निराशा केली आहे. महानगरीच्या गर्दीत कितीवेळा अशा प्रकारे संमेलने करणार? यामध्ये ग्रामीण भागाला कधी संधी मिळणार, हेही पाहिले पाहिजे. पुन्हा याच उत्साहाने संमेलनासाठी मागणी करू,असे वाटत नाही.- राजन खान, लेखक