शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटीएस’वर मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: July 13, 2017 01:41 IST

पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सातत्याने सतावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : शहरातील वाढती गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सातत्याने सतावत आहे़ मात्र, असे प्रकार दिवसेंदिवस घडत असताना मात्र पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचेच दिसून येत आहे. कारण अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी देऊनही वाकड पोलीस स्टेनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, परिसरातील रहिवाशी कमालीचे वैतागले आहेत. या ठिकाणी महिलांना छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकारात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या परिसरात रस्त्यावर बसून दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. धनगरबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दारूचे दुकान आहेत. एक दुकान देशी दारूचे आहे, तर एक दुकान देशी व विदेशी दारूचे आहे. त्यामुळे या दुकानांच्या दोनशे ते तीनशे मीटर परिसरात रस्त्यावर बसून सर्रास दारू पिणारे बसलेले असतात. या परिसरात भांडणाचे प्रकार घडत आहेत. मात्र नागरिक तक्रार करूनही वाकड पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत. या परिसरातील बीआरटीएस मार्गावर लाखो रुपये खर्च करून दोन अद्ययावत बसथांबे उभारण्यात आला आहेत. मात्र सध्या पावसाचे दिवस असल्याने याचा उपयोग सध्या दारू पिणारे करीत आहेत. या ठिकाणी उघड्यावर बसून दारू पिणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, याचेही गौडबंगाल येथील नागरिकांनाच उलघडत नाही. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत. या सर्व प्रकरणाला पोलिसांचा छुपा पाठिंबा तर नाही ना अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. >पोलीस चौकी : तक्रारीकडे केले जाते दुर्लक्षभर रस्त्यावर राजरोसपणे वाहनचालक, रहिवाशी, ये-जा करणाऱ्या नागरिकांची पर्वा न करता मद्यपी दारू पीत बसतात. एखाद्याने त्यांना हटकलेच तर दादागिरीची भाषा त्यांना करतात याला काय म्हणायचे. काही स्थानिक नागरिकांनी त्यांना त्या ठिकाणाहून उठविण्याचा प्रकारही केला. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. अनेक वेळा वाकड पोलीस स्टेशन व काळेवाडी पोलीस चौकीला तक्रारी करूनही त्याचा उपयोग झाला नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.