शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

युपीएच्या धर्तीवर देशातल्या तमाम शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: March 20, 2017 21:30 IST

मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 20  : मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने केलेल्या या नुकसानीची भरपाई पीक विम्यातून होत नाही, यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून मराठवाड्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यसभेत शून्यप्रहरात काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करतांना खासदार पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे दुष्काळाने हैराण केले. गतवर्षी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला वॉटर ट्रेन पाठवावी लागली. यंदा पाऊस बरा झाल्याने खरीप व रब्बीचे पीक चांगले आले. त्यानंतर शेती व्यवसायाला नोटबंदीचा फटका बसला.सहकारी बँकांकडून रक्कम मिळत नसल्याने या काळात शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांना तर खाजगी सावकारांकडून अधिक व्याजदराचे कर्ज उचलावे लागले. आता तीन दिवसांपूर्वी बिगरमोसमी पावसाच्या गारपीटीने अचानक शेतकऱ्यांना हैराण केले. निसर्ग आणि सरकारी निर्णय यांच्याशी सतत झुंज देत महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झाला असून राज्यातल्या प्रमुख पक्षांनी मागणी केल्यानुसार युपीए सरकारच्या धर्तीवर त्यांचे कर्ज माफ करावे, इतकेच नव्हे तर देशातल्या तमाम शेतकऱ्यांचे कर्ज केंद्राने किमान एकदा माफ करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी शून्यप्रहरात केली.