शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

युपीएच्या धर्तीवर देशातल्या तमाम शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: March 20, 2017 21:30 IST

मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 20  : मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने केलेल्या या नुकसानीची भरपाई पीक विम्यातून होत नाही, यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून मराठवाड्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यसभेत शून्यप्रहरात काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करतांना खासदार पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे दुष्काळाने हैराण केले. गतवर्षी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला वॉटर ट्रेन पाठवावी लागली. यंदा पाऊस बरा झाल्याने खरीप व रब्बीचे पीक चांगले आले. त्यानंतर शेती व्यवसायाला नोटबंदीचा फटका बसला.सहकारी बँकांकडून रक्कम मिळत नसल्याने या काळात शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांना तर खाजगी सावकारांकडून अधिक व्याजदराचे कर्ज उचलावे लागले. आता तीन दिवसांपूर्वी बिगरमोसमी पावसाच्या गारपीटीने अचानक शेतकऱ्यांना हैराण केले. निसर्ग आणि सरकारी निर्णय यांच्याशी सतत झुंज देत महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झाला असून राज्यातल्या प्रमुख पक्षांनी मागणी केल्यानुसार युपीए सरकारच्या धर्तीवर त्यांचे कर्ज माफ करावे, इतकेच नव्हे तर देशातल्या तमाम शेतकऱ्यांचे कर्ज केंद्राने किमान एकदा माफ करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी शून्यप्रहरात केली.