शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

जुन्नरमधील पथदिवे एलईडींनी उजळणार

By admin | Updated: March 4, 2017 01:11 IST

शहरातील पथदिवे एलईडी दिव्यांनी उजळणार असून, यासाठी जवळपास ५० लाखांची तरतूद केली आहे.

जुन्नर : शहरातील पथदिवे एलईडी दिव्यांनी उजळणार असून, यासाठी जवळपास ५० लाखांची तरतूद केली आहे. ३३ कोटी ६६ लाख ३८ हजार १०० रुपयांची जमेची तरतूद असणाऱ्या नगरपालिकेच्या वार्षिक सन २०१७-२०१८च्या अर्थसंकल्पाला सभेत सर्वानुमते मंजुरी दिली. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ नागरिकांवर लादलेली नसल्याने नागरिकांनी सुटकेच्या निश्वास सोडला. शहराच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी सांगितले.धर्मवीर संभाजीमहाराज सभागृहात सभेत एकमताने मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, गटनेते दिनेश दुबे, आघाडीचे गटनेते जमीर कागदी, नगरसेवक समीर भगत, अविन फुलपगार, फिरोज पठाण, भाऊसाहेब कुंभार, अविनाश करडिले, नितीन गांधी, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, वैष्णवी गवळी, सना मन्सूरी, हजरा इनामदार, समिना शेख उपस्थित होते. चिकनविक्रेते, मटणविक्रेते व मासेविक्रेते यांना प्रतिमहिना ३०० रुपये भाडे लागू करून नगरपालिका हद्दीत विनापरवाना अशी दुकाने सुरु करणाऱ्यांवर कारवाई करावी, पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक कॅरीबॅगबंदी, बेकायदेशीर फ्लेक्स बोर्ड यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर केला. भटक्या जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी आरक्षित जागेवर जनावरांसाठी कोंडवाडा उभारण्यास मंजुरी दिली.अर्थसंकल्पात १२ कोटी ५४ लाख १०० रुपये तसेच भांडवली जमा २१ कोटी १२ लाख रुपये असे एकूण ३३ कोटी ६६ लाख ३८ हजार १०० रुपये जमा बाजूला दाखविण्यात आले आहेत. एकूण महसुली खर्च १४ कोटी १२ लाख १८ हजार रुपये, तर भांडवली खर्च २४ कोटी ४ लाख ८६ हजार रुपये असा एकूण ३८ कोटी ६० लाख ७८ हजार रुपये खर्च बाजूला दाखविण्यात आला आहे.बंदअवस्थेत असलेला जलतरण तलाव तातडीने दुरुस्त करावा, तसेच पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नसून लवकरच शहरात मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करावा, असा ठराव मंजूर केला. शहरात बेकायदेशीर होत असलेल्या जनावरांच्या कत्तली रोखण्यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे सुधारित कत्तलखान्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्याची मागणी आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी केली होती.