शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सौरकृषी पंपाचा भार हलका करण्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांवर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:00 IST

विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाºया विद्युत शुल्कात राज्य सरकारने प्रतियुनिट दहा पैशांची वाढ केली आहे. तसे आदेशच राज्य सरकारने दिले आहेत.

मुंबई : सौरकृषी पंपाच्या अंमलबजावणीसाठीचे पैसे वसूल करण्यासाठी राज्य सरकारने विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या विद्युत शुल्कात प्रतियुनिट दहा पैशांची वाढ केली आहे. मुंबईत बेस्ट, अदानी, टाटाच्या घरगुती आणि व्यवसायिक, औद्योगिक, तसेच महावितरणच्या व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांना याचा फटका बसणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात येणारी जानेवारी महिन्याची वीजबिले वाढीव दराने येणार आहेत.

विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाºया विद्युत शुल्कात राज्य सरकारने प्रतियुनिट दहा पैशांची वाढ केली आहे. तसे आदेशच राज्य सरकारने दिले आहेत. १ जानेवारी, २०१९ पासून विद्युत शुल्क वाढ लागू झाली आहे. वीजग्राहकांना फेब्रुवारी महिन्यात येणारे जानेवारी महिन्याचे वीजबिल वाढीव येणार आहे. बेस्ट, टाटा आणि अदानीच्या व्यावसायिक वीजग्राहकांना यापूर्वी २४.०४ पैसे विद्युत शुल्क आकारले जात होते. आता यात प्रति युनिट दहा पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, विद्युत शुल्क ३४.०४ पैसे आकारले जाईल. निवासी वीजग्राहकांना यापूर्वी १६.४ पैसे विद्युत शुल्क आकारले जात होते. आता यात प्रतियुनिट दहा पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, विद्युत शुल्क २६.०४ पैसे आकारले जाणार आहेत.

वीज क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य सरकारला सौरकृषी पंप योजना राबवायची आहे. मात्र, राज्याकडे यासाठी पैसा नाही. राज्याकडे पैसा नसल्याने ते कुठून निर्माण करायचे; हा प्रश्न राज्याला पडला आहे. राज्याने यासाठी विद्युत शुल्कात दहा पैसे वाढ केली आहे. परिणामी, दर महिन्याला राज्याला वाढीव विद्युत शुल्काच्या दहा पैशातून नऊशे ते एक हजार कोटी रुपये मिळतील, मुळात हे वीज वापरावर अवलंबून आहे.