शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

सत्तावीस कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश

By admin | Updated: May 8, 2014 15:16 IST

खेड : तीन वर्षे अंधारात काढलेल्या ‘त्या’ २७ कुटुंंबांची घरं अखेर प्रकाशमान झाली

. आपल्या घरी वीज आल्याचा आनंद या लोकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. त्यांच्यात कमालीचा उत्साह दिसत होता. ही फार लांबची कथा नाही तर खेड तालुक्यातील गुणदे येथील गणवाल कळंबटेवाडीतील आहे. येथे राहणारी सर्व कुटुंब शेलारवाडी धरण प्रकल्पग्रस्त आहेत. पुनर्वसनाची वेळ आली, तेव्हा या मंडळींनी स्वेच्छा पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारला. गुणदेमध्ये आता जिथे वस्ती आहे, ती जमीन विकत घेऊन त्यांनी नव्याने घरं बांधली आणि आपला वर्षानुवर्षांचा संसार नव्या घरांमध्ये हलवला. घरं झाली होती, लोकं तिथं राहायला गेले होते. पण, वीज नव्हती. याचं कारण काही खासगी जमिनींच्या सात-बारावर असलेली असंख्य नावे! वीज पुरवठ्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जमीनमालकांनी ग्रामपंचायतीला संमतीपत्र देणे गरजेचे होते. ही संमती मिळत नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायत या कुटुंंबांना घरपट्टी देत नव्हती. परिणामी प्रस्ताव जात नव्हता. अशा विचित्र कात्रीत कळंबटेवाडीतील लोक सापडले होते. त्यामुळे तब्बल तीन वर्षे या लोकांना काळोखातच काढावी लागली होती. जमीन मालकांची संमतीपत्र सादर करूनही अधिकारी दाद देत नव्हते. आतापर्यंत स्वत: प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश येत नाही, हे लक्षात आल्यानंतर वाडीतील ग्रामस्थ बबलू आंब्रे यांच्या माध्यमातून माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यापर्यंत पोहोचले. स्वेच्छा पुनर्वसन असल्याने आमदार जाधव यांनी तत्काळ हा विषय ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात उपस्थित केला. अजित पवार यांनीही बसल्या जागेवरून वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना केली. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली. तीन वर्षे वीज मिळावी म्हणून धडपडणार्‍या कळंबटेवाडीचा प्रश्न अवघ्या काही मिनिटांत मार्गी लागला होता. यानंतरच्या काही दिवसांतच काम पूर्ण होऊन विजेच्या दिव्यांनी घरे उजळली. तीन वर्षांपासूनचा अंधार दूर करणार्‍या भास्कर जाधव यांचा वाजतगाजत सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)