शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आयुष्याचाच झालाय तमाशा!

By admin | Updated: February 21, 2016 02:39 IST

महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी

- प्राची सोनवणे, नवी मुंबई महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या एका तमाशा महोत्सवाच्या अंतर्गत तमाशा मंडळांना ५१ हजार रुपयांची बिदागी दिली जाते. मिळालेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने या कलाकारांना गावातील सावकाराकडून ३ ते ४ टक्के दराने कर्ज काढावे लागते. वाशी येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१६निमित्त तमाशा कलावंतांशी चर्चा केली असता आमच्या आयुष्याचाच तमाशा झाल्याचे वक्तव्य कलाकारांनी केले. कला जिवंत ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे हे शासन लोककलेला मात्र जिवंत ठेवण्यात निष्क्रिय ठरत आहे. वर्षातले चार-पाच माहने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्रांत तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाची भूक शमवावी लागते. ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षापासूनची ही कला आता पार कालबाह्य होत चालली असून, कलाकारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्र म होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा विसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री पाचेक तासांचा तमाशा संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुढल्या गावाच्या दिशेने प्रवास करायचा, असा या कलावंतांचा दिनक्र म. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते. ‘फार्स’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते. गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या, बिगारी, आचारी, ड्रायव्हर या साऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी तमाशा सादर केला जातो. ‘कार्यक्र म रंगला नाही’असे कारण पुढे करीत तमाशाच्या आयोजक मंडळींकडून अनेकदा ठरलेले पैसेही दिले जात नाहीत, अशा अनेक व्यथा कलाकांनी मांडल्या. अनेक कार्यक्र म करूनही काही वेळेस जेवणासाठीही पैसा शिल्लक राहत नसल्याची माहिती महिला कलाकारांनी दिली. वेतन देणे मालकाला परवडत नाही. कलावंतांना मोसम सुरू होण्यापूर्वी ठिकठिकाणाहून खास सरावासाठी महिनाभर आधी बोलवावे लागते. त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते. महोत्सवातही गैरसोयीवाशी रेल्वे स्थानकाजवळी मैदानावर आयोजित या महोत्सवात परगावाहून आालेल्या कलावंतांसाठी शौचालयाची व्यवस्था देखील केलेली नसून, महिला कलाकारांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तान्ह्या मुलांचे हालतमाशा फडातील कलाकारांची तान्ह्या मुलांना रात्रीच्या वेळी रिकाम्यापोटी झोपावे लागते. कार्यक्रमात कला दाखविणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मुलांकडे पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही. दिवसभर आईवडिलांसोबत उन्हातान्हात भटकून दमलेल्या या जीवांना कित्येकदा रात्र उपाशीपोटी काढावी लागते. कार्यक्रम सुरू असताना अडचण होऊ नये म्हणून बाजूला सारलेली ही मुले कधी झोपी जातात याचीही खबर नसते.गावोगावी फिरस्तीवर असणारी या कुटुंबातील पोरंबाळं मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. यामधील ९५ टक्के मुलांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही.महिला कलाकारांशी संवाद साधला असता महिला नृत्यांगना छाया काटे यांनी महिला कलाकारांना समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते. कलावंतांची शासनाकडून दखलही घेतली जात नाही. कलावंतांची ही उपेक्षा पाहता म्ािहलावर्ग, वादक यांनी मात्र या लोकक लेकडे पाठ फिरविली आहे. कार्यक्रमाचा रोजचा खर्च ४० ते ४५ हजार रुपये इतका असून, एवढा पैसा उभारायचा तरी कसा, यातून काही शिल्लक राहतच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा करणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कलावंतांना न परवडणाराच आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांच्या समस्या आधी सोडविल्या पाहिजेत.- भीमराव गोपाळ, संचालक, भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सांगवी