शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

आयुष्याचाच झालाय तमाशा!

By admin | Updated: February 21, 2016 02:39 IST

महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी

- प्राची सोनवणे, नवी मुंबई महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या एका तमाशा महोत्सवाच्या अंतर्गत तमाशा मंडळांना ५१ हजार रुपयांची बिदागी दिली जाते. मिळालेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने या कलाकारांना गावातील सावकाराकडून ३ ते ४ टक्के दराने कर्ज काढावे लागते. वाशी येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१६निमित्त तमाशा कलावंतांशी चर्चा केली असता आमच्या आयुष्याचाच तमाशा झाल्याचे वक्तव्य कलाकारांनी केले. कला जिवंत ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे हे शासन लोककलेला मात्र जिवंत ठेवण्यात निष्क्रिय ठरत आहे. वर्षातले चार-पाच माहने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्रांत तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाची भूक शमवावी लागते. ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षापासूनची ही कला आता पार कालबाह्य होत चालली असून, कलाकारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्र म होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा विसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री पाचेक तासांचा तमाशा संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुढल्या गावाच्या दिशेने प्रवास करायचा, असा या कलावंतांचा दिनक्र म. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते. ‘फार्स’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते. गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या, बिगारी, आचारी, ड्रायव्हर या साऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी तमाशा सादर केला जातो. ‘कार्यक्र म रंगला नाही’असे कारण पुढे करीत तमाशाच्या आयोजक मंडळींकडून अनेकदा ठरलेले पैसेही दिले जात नाहीत, अशा अनेक व्यथा कलाकांनी मांडल्या. अनेक कार्यक्र म करूनही काही वेळेस जेवणासाठीही पैसा शिल्लक राहत नसल्याची माहिती महिला कलाकारांनी दिली. वेतन देणे मालकाला परवडत नाही. कलावंतांना मोसम सुरू होण्यापूर्वी ठिकठिकाणाहून खास सरावासाठी महिनाभर आधी बोलवावे लागते. त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते. महोत्सवातही गैरसोयीवाशी रेल्वे स्थानकाजवळी मैदानावर आयोजित या महोत्सवात परगावाहून आालेल्या कलावंतांसाठी शौचालयाची व्यवस्था देखील केलेली नसून, महिला कलाकारांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तान्ह्या मुलांचे हालतमाशा फडातील कलाकारांची तान्ह्या मुलांना रात्रीच्या वेळी रिकाम्यापोटी झोपावे लागते. कार्यक्रमात कला दाखविणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मुलांकडे पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही. दिवसभर आईवडिलांसोबत उन्हातान्हात भटकून दमलेल्या या जीवांना कित्येकदा रात्र उपाशीपोटी काढावी लागते. कार्यक्रम सुरू असताना अडचण होऊ नये म्हणून बाजूला सारलेली ही मुले कधी झोपी जातात याचीही खबर नसते.गावोगावी फिरस्तीवर असणारी या कुटुंबातील पोरंबाळं मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. यामधील ९५ टक्के मुलांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही.महिला कलाकारांशी संवाद साधला असता महिला नृत्यांगना छाया काटे यांनी महिला कलाकारांना समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते. कलावंतांची शासनाकडून दखलही घेतली जात नाही. कलावंतांची ही उपेक्षा पाहता म्ािहलावर्ग, वादक यांनी मात्र या लोकक लेकडे पाठ फिरविली आहे. कार्यक्रमाचा रोजचा खर्च ४० ते ४५ हजार रुपये इतका असून, एवढा पैसा उभारायचा तरी कसा, यातून काही शिल्लक राहतच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा करणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कलावंतांना न परवडणाराच आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांच्या समस्या आधी सोडविल्या पाहिजेत.- भीमराव गोपाळ, संचालक, भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सांगवी