शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

खोट्या गुन्ह्यामुळे आयुष्यच उद्ध्वस्त...

By admin | Updated: June 6, 2017 05:59 IST

वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली.

मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली. त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली, तरी या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबच उद्ध्वस्त झाले, अशी खंत रत्नागिरीच्या ७५ वर्षीय माजी सरपंचाने व्यक्त केली. खोटा आरोप करणाऱ्या तक्रारदारावर तसेच कुठलीही शहानिशा न करता गुन्ह्या दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी आता लढा उभारला आहे. रत्नागिरीच्या राजापूर येथील बुरंबेवाडीत ७५ वर्षांचे अशोक मयेकर कुटुंबीयांसह राहतात. २००४ मध्ये गावातील ६२ वर्षांचे तानाजी कदम यांच्यावर तेथील रहिवासी विश्वनाथ कदम यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. गावचे सरपंच म्हणून मयेकर यांनी खटला दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. हाच राग मनात धरत, ३ आॅक्टोबर २००५ मध्ये विश्वनाथच्या पत्नीने मयेकर यांच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पुढे राजापूर न्यायालयात त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले. अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर २०१० मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या कालावधीत पद-प्रतिष्ठा दोन्हीही गेले. त्यांना सहकुटुंब गाव सोडावे लागले, असे मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पोलीस महासंचालकांकडेही त्यांनी न्यायासाठी अर्ज केला आहे.न्यायासाठी लढाखोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.