शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

खोट्या गुन्ह्यामुळे आयुष्यच उद्ध्वस्त...

By admin | Updated: June 6, 2017 05:59 IST

वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली.

मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली. त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली, तरी या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबच उद्ध्वस्त झाले, अशी खंत रत्नागिरीच्या ७५ वर्षीय माजी सरपंचाने व्यक्त केली. खोटा आरोप करणाऱ्या तक्रारदारावर तसेच कुठलीही शहानिशा न करता गुन्ह्या दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी आता लढा उभारला आहे. रत्नागिरीच्या राजापूर येथील बुरंबेवाडीत ७५ वर्षांचे अशोक मयेकर कुटुंबीयांसह राहतात. २००४ मध्ये गावातील ६२ वर्षांचे तानाजी कदम यांच्यावर तेथील रहिवासी विश्वनाथ कदम यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. गावचे सरपंच म्हणून मयेकर यांनी खटला दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. हाच राग मनात धरत, ३ आॅक्टोबर २००५ मध्ये विश्वनाथच्या पत्नीने मयेकर यांच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पुढे राजापूर न्यायालयात त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले. अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर २०१० मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या कालावधीत पद-प्रतिष्ठा दोन्हीही गेले. त्यांना सहकुटुंब गाव सोडावे लागले, असे मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पोलीस महासंचालकांकडेही त्यांनी न्यायासाठी अर्ज केला आहे.न्यायासाठी लढाखोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.