शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या गुन्ह्यामुळे आयुष्यच उद्ध्वस्त...

By admin | Updated: June 6, 2017 05:59 IST

वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली.

मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली. त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली, तरी या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबच उद्ध्वस्त झाले, अशी खंत रत्नागिरीच्या ७५ वर्षीय माजी सरपंचाने व्यक्त केली. खोटा आरोप करणाऱ्या तक्रारदारावर तसेच कुठलीही शहानिशा न करता गुन्ह्या दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी आता लढा उभारला आहे. रत्नागिरीच्या राजापूर येथील बुरंबेवाडीत ७५ वर्षांचे अशोक मयेकर कुटुंबीयांसह राहतात. २००४ मध्ये गावातील ६२ वर्षांचे तानाजी कदम यांच्यावर तेथील रहिवासी विश्वनाथ कदम यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. गावचे सरपंच म्हणून मयेकर यांनी खटला दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. हाच राग मनात धरत, ३ आॅक्टोबर २००५ मध्ये विश्वनाथच्या पत्नीने मयेकर यांच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पुढे राजापूर न्यायालयात त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले. अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर २०१० मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या कालावधीत पद-प्रतिष्ठा दोन्हीही गेले. त्यांना सहकुटुंब गाव सोडावे लागले, असे मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पोलीस महासंचालकांकडेही त्यांनी न्यायासाठी अर्ज केला आहे.न्यायासाठी लढाखोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.