शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हत्येप्रकरणी चौघांची जन्मठेप कायम

By admin | Updated: November 3, 2015 03:15 IST

१९९२च्या जातीय दंगलीमध्ये एका मुसलमान दाम्पत्याची हत्या करणाऱ्या चौघांच्या जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. सरकारी वकिलाने सर्व आरोप सिद्ध

मुंबई : १९९२च्या जातीय दंगलीमध्ये एका मुसलमान दाम्पत्याची हत्या करणाऱ्या चौघांच्या जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. सरकारी वकिलाने सर्व आरोप सिद्ध केले, असे म्हणत चौघांना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने योग्य ठरवली.सुहास पांचाळ, संजय मांडवकर, सुनील मांडवकर आणि चंदन लोखंडे यांना सत्र न्यायालयाने एका मुस्लीम दाम्पत्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवत २०११मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध या चौघांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलावरील सुनावणी हंगामी मुख्य न्या. विजया ताहिलरमाणी-कापसे आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर होती. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर १९९२च्या जातीय दंगलीनंतर आरोपींनी गनी शेख आणि त्याची पत्नी राबिया शेख यांना राहते घर रिकामे करण्यास सांगितले होते. ११ जानेवारी १९९३च्या रात्री चारही आरोपींनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली आणि राबियाला घराबाहेर खेचून काढले. तिच्यावर तलवारीने वार केले आणि गनी शेखवरही हल्ला केला. राबियाचा तत्काळ मृत्यू झाला तर गनीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांची चार मुले घटनास्थळावरून निसटण्यात यशस्वी झाली. चार मुलांच्या जबाबावर सरकारी वकिलांचा युक्तिवाद अवलंबून आहे, असे आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील एस.आर. चिटणीस यांनी म्हटले. या चार मुलांनी जबाब दिला असला, तरी आरोपींची नावे सांगितलेली नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. खंडपीठाने अपील फेटाळले सर्व साक्षी-पुराव्यांची पडताळणी केल्यावर खंडपीठाने आरोपींचे अपील फेटाळले. एकाच उद्देशाने गुन्हा करण्यासाठी आरोपींनी कट रचला आणि त्या कटानुसार त्यांनी गुन्हा केला. त्यामुळे त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या गुन्ह्यांतर्गत ते दोषी आहेत, असे म्हणत खंडपीठाने या चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम केली. एका आरोपीच्या भावाला १९९२च्या दंगलीत मारहाण झाल्याने त्यांचा मुस्लीम समाजावर राग होता. या रागातून त्यांनी घटना घडण्यापूर्वी शेख आणि त्याच्या पत्नीला तातडीने चेंबूर येथील राहते घर खाली करण्यास सांगितले होते, असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले.