शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या आरोपातून सुटका झालेल्यास २२ वर्षांनी जन्मठेप

By admin | Updated: May 24, 2017 03:19 IST

हत्येचा आरोप असलेल्याची निर्दोष सुटका करण्याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हत्येचा आरोप असलेल्याची निर्दोष सुटका करण्याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनंतर रद्द करीत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तीन महिन्यांत त्याला न्यायालयात शरणागती पत्करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. २५ जानेवारी १९९५ रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने कृष्णनाथ बाबूराव पाटील याची हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. मात्र या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. १९९५पासून हे अपील उच्च न्यायालयात प्रलंबित होते. अखेरीस १५ मे २०१७ रोजी उच्च न्यायालयाने या अपिलावरील सुनावणी पूर्ण करीत कृष्णकांत याला हत्येप्रकरणी दोषी ठरवले. यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावत तीन महिन्यांत न्यायालयापुढे शरणागती पत्करण्यास सांगितले. तीन महिन्यांत आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही, तर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावे, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. आरोपीला कोणत्या आधारावर जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, याची कारणमीमांसा स्वतंत्रपणे देऊ, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.