शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 17:36 IST

जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 29 - जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यांचा मुलगा संगीत दाते वाकड पुलाच्या खाली भिकाऱ्याचे जिणे जगत आहे. त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. एक चांगल्या घरातील ४८ वर्षीय विषय पुरुष वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून बेवारसरीत्या अन्न-पाण्यावाचून पडून असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस नाईक विष्णू नागरे यांना समजली. त्यांनी तात्काळ धाव घेत विचारपूस केली. त्यांना ज्यूस पाजला मात्र ते स्वत:ची ओळख सांगण्यास टाळाटाळ करीत होत.

अखेर विश्वासात घेतल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी सांगितले की मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, ही बाब नांगरे यांनी तात्काळ लोकमतला कळविली. लोकमत प्रतिनिधीने हा व्यक्ती खरेच अरुण दाते यांचे सुपुत्र आहेत का, याची खातरजमा करून त्यांची माहिती घेतली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली.

संगीत अरुण दाते असे माझे नाव असून, मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, असे ते म्हणतात. मला मोठ्या भावाने वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. सुमारे तीन वर्षांपासून पत्नी आणि मी विभक्त झालो आहोत. माझा वांद्र्यातील फ्लॅट होता. तो नुकताचा विकला आहे. हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना अज्ञात वाहनाने मला धक्का दिला अन् मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग माझा, मोबाईल, पाकीट, चेक बुक, एटीएम, बॅगमधील सर्व कागदपत्रे कोणी तरी चोरली.

संगीत म्हणाले, "एका रिक्षा चालकाने १०८ ला फोन करून मला मदत केली. ससूनमध्ये दाखल झालो, तिथे २० दिवस उपचार घेतले. अन् त्यानंतर मी तिथून इथपर्यंत कसा आलो हे मला माहीत नसल्याचे सांगतात. मात्र जेव्हा इथे आलो तेव्हा रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकल्याने पायाला जखम झाली आहे. त्यामुळे मी जोरजोरात रडत असताना मला एका भिकाऱ्याने चादर आणि अंथरायला दिले." याबाबत संगीत दाते यांच्या पत्नी मेदीनी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी त्यांचा संगीत यांच्याबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यांच्याशी माझा काही संबध नसल्याचे सांगितले. याबाबत अतुल दाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "संगीत यांच्यामुळे कुटुंबीयांना खूप त्रास झाला आहे. त्याचे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्याला कुटुंबापासून खूप वर्षापूर्वी कायदेशीर प्रक्रिया करून विभक्त केले आहे."