शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 17:36 IST

जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 29 - जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यांचा मुलगा संगीत दाते वाकड पुलाच्या खाली भिकाऱ्याचे जिणे जगत आहे. त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. एक चांगल्या घरातील ४८ वर्षीय विषय पुरुष वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून बेवारसरीत्या अन्न-पाण्यावाचून पडून असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस नाईक विष्णू नागरे यांना समजली. त्यांनी तात्काळ धाव घेत विचारपूस केली. त्यांना ज्यूस पाजला मात्र ते स्वत:ची ओळख सांगण्यास टाळाटाळ करीत होत.

अखेर विश्वासात घेतल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी सांगितले की मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, ही बाब नांगरे यांनी तात्काळ लोकमतला कळविली. लोकमत प्रतिनिधीने हा व्यक्ती खरेच अरुण दाते यांचे सुपुत्र आहेत का, याची खातरजमा करून त्यांची माहिती घेतली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली.

संगीत अरुण दाते असे माझे नाव असून, मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, असे ते म्हणतात. मला मोठ्या भावाने वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. सुमारे तीन वर्षांपासून पत्नी आणि मी विभक्त झालो आहोत. माझा वांद्र्यातील फ्लॅट होता. तो नुकताचा विकला आहे. हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना अज्ञात वाहनाने मला धक्का दिला अन् मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग माझा, मोबाईल, पाकीट, चेक बुक, एटीएम, बॅगमधील सर्व कागदपत्रे कोणी तरी चोरली.

संगीत म्हणाले, "एका रिक्षा चालकाने १०८ ला फोन करून मला मदत केली. ससूनमध्ये दाखल झालो, तिथे २० दिवस उपचार घेतले. अन् त्यानंतर मी तिथून इथपर्यंत कसा आलो हे मला माहीत नसल्याचे सांगतात. मात्र जेव्हा इथे आलो तेव्हा रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकल्याने पायाला जखम झाली आहे. त्यामुळे मी जोरजोरात रडत असताना मला एका भिकाऱ्याने चादर आणि अंथरायला दिले." याबाबत संगीत दाते यांच्या पत्नी मेदीनी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी त्यांचा संगीत यांच्याबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यांच्याशी माझा काही संबध नसल्याचे सांगितले. याबाबत अतुल दाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "संगीत यांच्यामुळे कुटुंबीयांना खूप त्रास झाला आहे. त्याचे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्याला कुटुंबापासून खूप वर्षापूर्वी कायदेशीर प्रक्रिया करून विभक्त केले आहे."