शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

लिचीचा भाव गगनाला

By admin | Updated: May 23, 2017 03:30 IST

भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून

अनिरूध्द पाटील लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून, उन्हाळ््यात पर्यटक खास तिचा आस्वाद घेण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादन घटल्याने लिचीचे भाव गगनाला भिडले आहेत. १५० फळांच्या करंडीसाठी ८०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हा दर ५०० रुपये होता, तर एका फळाची किंमत ६ ते १० रुपये आहे.लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असून, तिचे मूळ चीनमध्ये आहे. सतराव्या शतकात तिचे भारतात आगमन झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी येथील हवामान तिला सर्वाधिक मानवते. त्यामुळेच हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार तिच्या ८ ते १० जाती आहेत. घोलवड लिची म्हणून प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून वाढलेल्या झाडाला १५ वर्षांनी तर गुटी कलमापासून वाढलेले झाड ७ ते ८ वर्षांनी फळे देते. एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलोपर्यंत येते. धारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसांत फळ काढणीस तयार होते. नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आला की, फळे तयार होतात. मेचा मध्य ते जूनचा पहिला आठवडा काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या करंड्यात किंवा खोक्यात करंज झाडाचा हिरव्या पाल्यात तिचे पॅकिंग केली जाते. सध्या या फळावर लाल कोळी, साल खाणारी अळी, लालभुंगा, नागअळी आदींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होत असल्याने, बागायतदारांनी झाडे छाटण्यास सुरुवात केली आहे. खते व कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढीव दर, यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, गत वर्षी १५० फळांसाठी ५०० रुपयांचा दर या हंगामात ८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे स्थानिक, तसेच परगावतून या फळांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या खवयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ धनाढ्य लोकांच्या आवाक्यातील श्रीमंत फळ म्हणून ते आता अस्तित्वात उरले आहे.