शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लिचीचा भाव गगनाला

By admin | Updated: May 23, 2017 03:30 IST

भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून

अनिरूध्द पाटील लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून, उन्हाळ््यात पर्यटक खास तिचा आस्वाद घेण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादन घटल्याने लिचीचे भाव गगनाला भिडले आहेत. १५० फळांच्या करंडीसाठी ८०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हा दर ५०० रुपये होता, तर एका फळाची किंमत ६ ते १० रुपये आहे.लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असून, तिचे मूळ चीनमध्ये आहे. सतराव्या शतकात तिचे भारतात आगमन झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी येथील हवामान तिला सर्वाधिक मानवते. त्यामुळेच हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार तिच्या ८ ते १० जाती आहेत. घोलवड लिची म्हणून प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून वाढलेल्या झाडाला १५ वर्षांनी तर गुटी कलमापासून वाढलेले झाड ७ ते ८ वर्षांनी फळे देते. एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलोपर्यंत येते. धारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसांत फळ काढणीस तयार होते. नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आला की, फळे तयार होतात. मेचा मध्य ते जूनचा पहिला आठवडा काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या करंड्यात किंवा खोक्यात करंज झाडाचा हिरव्या पाल्यात तिचे पॅकिंग केली जाते. सध्या या फळावर लाल कोळी, साल खाणारी अळी, लालभुंगा, नागअळी आदींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होत असल्याने, बागायतदारांनी झाडे छाटण्यास सुरुवात केली आहे. खते व कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढीव दर, यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, गत वर्षी १५० फळांसाठी ५०० रुपयांचा दर या हंगामात ८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे स्थानिक, तसेच परगावतून या फळांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या खवयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ धनाढ्य लोकांच्या आवाक्यातील श्रीमंत फळ म्हणून ते आता अस्तित्वात उरले आहे.