शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

कोकण रेल्वेला एलआयसीची मदत मिळणार

By admin | Updated: March 23, 2016 03:49 IST

कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

मुंबई : कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. यामुळे दुहेरीकरणासह, विद्युतीकरण आणि अन्य प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल. कोकण रेल्वेचा पसारा रोहापासून ते ठोकूरपर्यंत असून, यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये सहभागी आहेत. या मार्गांवर सध्या कोकण रेल्वेकडून विकासकामे हाती घेण्यात आली असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. यात महत्त्वाचे काम असलेल्या दुहेरी मार्गासाठी तर दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २९५ कोटी इतका खर्च आहे. दुहेरीकरणाच्या या प्रकल्पात ११ नवीन स्थानकेही बांधण्यात येणार असून, त्यासाठीही निधीची गरज भासणार आहे. कोकण रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरणही केले जाणार असून, हजारो कोटी रुपये खर्च येईल. त्याच्या निधीसाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी एलआयसीकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आणि तसा करारही केला. त्याचा फायदा कोकण रेल्वेलाही झाला. (प्रतिनिधी)