शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

एलआयसीचे अधिकारी संशयाच्या घेर्‍यात

By admin | Updated: May 11, 2014 00:06 IST

केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे.

जनश्री विमा योजना भ्रष्टाचार प्रकरण : आंदोलनाचा इशारानागपूर : केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेत चौकशी सुरू असून, यात आठ संस्था बनावट आढळल्या आहे. या संस्थांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने एलआयसीला १ महिन्यापूर्वी पत्र पाठविले होते. मात्र एलआयसीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एलआयसीच्या अधिकार्‍यांचे दोषींना पाठबळ मिळत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते राजू भुंजे यांनी केला. ९ ते १२ वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जनश्री विमा योजनेंतर्गत वर्षाला १२०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या एस. बी. बहुउद्देशीय महिला मंडळ, किरण बहुउद्देशीय महिला मंडळ, सुसंस्कार बहुउद्देशीय महिला मंडळ, महाराष्ट्र राज्य महिला संस्था, केअर कल्चरल असोसिएशन फॉर रुरल एज्युकेशन व पराते एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत करोडो रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. या संस्था चंद्रशेखर भिसीकर नावाच्या व्यक्तीच्या असून, या संस्थेतील पदाधिकारी बनावट असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत आढळले आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गुन्हे शाखेने २६ मार्च २०१४ ला एलआयसीला सहकार्याचे पत्र पाठविले. मात्र एलआयसीने कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. या प्रकरणाची चौकशी दोन महिन्यात करावी, अशी मागणी राजू भुंजे यांनी पत्रकार परिषदेत केली. अन्यथा संविधान चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.