शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

हरित मुंबईसाठी प्रयत्न करू या!

By admin | Updated: May 4, 2015 02:01 IST

मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने ही उपयुक्त असून शासन आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने ही उपयुक्त असून शासन आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महापालिकेतर्फे दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रमोद महाजन यांनी राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले. टेलिकम्युनिकेशन क्रांतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.भाजीवाला, रिक्षावाल्याकडे ज्या दिवशी भ्रमणध्वनी असेल तो दिवस सुदिन असल्याचे त्यांचे मत होते. सूक्ष्म नियोजनामध्ये त्यांची हातोटी होती. परिपूर्णतेमध्ये त्यांनी तडजोड केली नाही. गुणवत्तेचे अत्युच्च शिखर त्यांच्यामध्ये पहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या, उदंचन केंद्राच्या जागी उद्यानाची कल्पना ही अप्रतिम असून उद्यानात २५ हजार ९०० चौरस मीटरवर १४० प्रजातींची १ लाखांहून अधिक शोभिवंत फुलझाडे व झुडपे आहेत. भविष्यात ३० ते ३२ उद्यानांचा विकास होणार असून आजपासून त्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.उद्योगमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, खासदार पूनम महाजन, आमदार सदा सरवणकर, राज पुरोहित, पराग अळवणी, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन, देवयानी फरांदे, उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि रेखा महाजन तसेच अनेक नागरिक या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)