शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चला दोघे मिळून रस्ते पाहून येऊ!

By admin | Updated: December 3, 2015 01:28 IST

हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट

मुंबई : हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट आव्हान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एकाच दिवशी १ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याबाबत भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र पाठवले होते. त्यात म्हटले होते की, ‘भाजपा शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून राज्यात एक हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे एकाच दिवशी भूमिपूजन करून नवीन काहीतरी जगावेगळे केले, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या नियमित कामे एकत्रित केली गेली आहेत, शिवाय यातील अनेक कामांचे स्थानिक आमदारांनी आधीच भूमिपूजन करून घेतले आहे.राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामांची देखभाल करणेसुद्धा आता सा.बां. विभागाला अवघड झाले आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करण्यापेक्षा, आहे त्या रस्त्यांची तरी देखभाल करावी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी पत्रात व्यक्त केली होती. (विशेष प्रतिनिधी)ज्येष्ठत्वावरून टोमणाभुजबळ यांच्या या पत्राला पाटील यांनी तितकेच ‘खोचक’ उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘आपला या खात्यातील अनुभव ‘दांडगा’ आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे हे खरे आहे, पण मागील १० ते १५ वर्षांच्या काळात झालेली ही अधोगती असून, आपण आपल्या पत्रातून एकप्रकारे प्रांजळ कबुलीच दिली असून, यातून आपले ‘ज्येष्ठत्व’ सिद्ध होते. त्यामुळे राज्यात कोठे आणि कधी जायचे हे ठरविण्यासाठी माझ्या कार्यालयात किंवा घरी आपले स्वागत आहे,’ असा चिमटाही काढला आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या कार्यालयातून हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले.