शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

चला दोघे मिळून रस्ते पाहून येऊ!

By admin | Updated: December 3, 2015 01:28 IST

हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट

मुंबई : हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट आव्हान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एकाच दिवशी १ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याबाबत भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र पाठवले होते. त्यात म्हटले होते की, ‘भाजपा शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून राज्यात एक हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे एकाच दिवशी भूमिपूजन करून नवीन काहीतरी जगावेगळे केले, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या नियमित कामे एकत्रित केली गेली आहेत, शिवाय यातील अनेक कामांचे स्थानिक आमदारांनी आधीच भूमिपूजन करून घेतले आहे.राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामांची देखभाल करणेसुद्धा आता सा.बां. विभागाला अवघड झाले आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करण्यापेक्षा, आहे त्या रस्त्यांची तरी देखभाल करावी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी पत्रात व्यक्त केली होती. (विशेष प्रतिनिधी)ज्येष्ठत्वावरून टोमणाभुजबळ यांच्या या पत्राला पाटील यांनी तितकेच ‘खोचक’ उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘आपला या खात्यातील अनुभव ‘दांडगा’ आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे हे खरे आहे, पण मागील १० ते १५ वर्षांच्या काळात झालेली ही अधोगती असून, आपण आपल्या पत्रातून एकप्रकारे प्रांजळ कबुलीच दिली असून, यातून आपले ‘ज्येष्ठत्व’ सिद्ध होते. त्यामुळे राज्यात कोठे आणि कधी जायचे हे ठरविण्यासाठी माझ्या कार्यालयात किंवा घरी आपले स्वागत आहे,’ असा चिमटाही काढला आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या कार्यालयातून हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले.